शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महसूल अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांची दगडफेक

By admin | Updated: June 22, 2014 00:22 IST

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली.

श्रीगोंदा : सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांना दगडफेक केली. वाळू उपसा करणारे सहा जेसीबी वाळू तस्करांनी पळवून नेले. दगडफेकीत दुर्दैवाने कोणी जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी दुपारी १२-३० वाजण्याच्या सुमारास घडली.यासंदर्भात काष्टीचे कामगार तलाठी लक्ष्मण गराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ५०-६० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, सांगवी दुमाला शिवारातील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा चालू आहे, अशी माहिती समजली. त्यानुसार तहसीलदार भामरे यांनी मंडल अधिकारी संजय जगताप, एस. आर. दीक्षित, कामगार तलाठी लक्ष्मण गराडे, जयसिंग मापारी, तुकाराम भोसले, धोंडीबा मेहत्रे, संतोष सोबले यांच्यासह भीमा नदीपात्रात छापा टाकला. तहसीलदारांच्या सुचनेनुसार अधिकाऱ्यांनी सहा जेसीबी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र, वाळू तस्कारांंनी पथकावर थेट दगडफेक सुरू केली. महसूल अधिकारी पाहताच सहा जेसीबी पळून नेले. महसूल खात्याचे पथक रिकाम्या हातांनी जीव मुठीत धरून श्रीगोंद्याला परतले. सांगवी शिवारातील वाळू उपसा बंद करण्यासाठी छापा टाकावयाचा आहे. काष्टी परिक्षेत्रातील पोलिसांना माहिती दिली होती. परंतु काष्टीचे पोलीस उशिरा सांगवीत पोहचले. पोलीस उशिरा का पोहचले याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)श्रीगोंद्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी छापा मोहीम अधिक व्यापक करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वाळू तस्करी रोखणार आहे. ज्या गावात वाळू तस्करी होती याची खरी माहिती न कळविल्यास संबंधीत तलाठ्यांवर कारवाई करणार आहे.-डॉ.विनोद भामरेतहसीलदार,