शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

घरांवर काळे झेंडे फडकवून मोदी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST

संगमनेर तालुका किसान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, शांताराम गोसावी, सुनंदा राहणे, ज्ञानदेव ...

संगमनेर तालुका किसान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, शांताराम गोसावी, सुनंदा राहणे, ज्ञानदेव सहाणे, ज्ञानेश्वर राक्षे, आदी सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या घरावर, कार्यालयावर काळा झेंडा फडकावून मोदी सरकारचा निषेध करावा, असे आवाहन करण्यात आले होते.

ॲड. शिवूरकर म्हणाल्या, बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द केले. घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, रेल्वे, कोळसा व अन्य खनिज उद्योग भांडवलदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकण्याचे मोठे षङयंत्र या सरकारने यशस्वी केले. सरकारच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. देशातील शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीने संघर्ष करून मिळविलेले हक्क आणि कायदे बहुमताच्या जोरावर संघटनांशी आणि संसदेत चर्चा न करता नष्ट करण्यात आले आहेत.

शेतकरी संघटनांनी मागणी केलेली नसताना, या संघटनांचा विरोध असताना गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात घाईने तीन काळे कृषी कायदे मंजूर केले. या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास २६ मे ला सहा महिने पूर्ण झाले. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकरी हटले नाहीत. कोरोनाकाळात जनता उपचार, औषधे आणि ऑक्सिजनअभावी मृत्यूचा सामना करीत असताना मोदी, शहा निवडणूक प्रचारात दंग होते. सेंट्रल विस्टा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. देश संकटात असताना पक्षीय आणि द्वेषाचे राजकारण करण्यात सरकार दंग आहे. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने देशभर ‘मोदी सरकार निषेध दिवस’ पाळण्यात आला, असेही ॲड. शिवूरकर यांनी सांगितले.