शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

पर्यावरण समितीअभावी वाळू लिलाव लांबणीवर

By admin | Updated: October 17, 2016 01:06 IST

अहमदनगर : पर्यावरण तज्ज्ञ समितीअभावी वाळू लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे़ ग्रामपंचायतींची मंजुरी मिळूनही प्रस्ताव लालफितीत अडकले असून,

अहमदनगर : पर्यावरण तज्ज्ञ समितीअभावी वाळू लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे़ ग्रामपंचायतींची मंजुरी मिळूनही प्रस्ताव लालफितीत अडकले असून, वाळूमाफियांना रान मोकळे आहे़ बेकायदा उपशावरून अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे़ या हल्ल्यांतून प्रशासन धडा घेणार की नदीपासून ते लिलावापर्यंत केवळ कागदी घोडे नाचवित राहणार हा खरा प्रश्न आहे़गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला़ त्यामुळे नद्या वाहत्या झाल्या़ पाण्याबरोबर वाळूही वाहून आली़ या वाळूवर वाळूतस्करांचा डोळा आहे़ अधिकृत लिलाव न घेताच वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा कधीचाच सुरू झाला आहे़ उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, गोदावरी आणि प्रवरा नदी पात्रात उत्तम प्रतीची वाळू आहे़ या वाळूला सोन्याचा भाव आहे़ पावसामुळे बांधकाम क्षेत्रातील मंदीही काहीशी दूर झाली आहे़ बांधकाम व्यावसायिकांकडून वाळूची मागणी वाढली आहे़ मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत़ या वाळूमाफियांना रोखण्यासाठी प्रशासनाकडे सक्षम यंत्रणा नाही़ जिल्हास्तरीय पथक नियुक्त केले आहे़ मात्र हे पथकही नावालाच आहे़ पथक कारवाईसाठी गेले़ पण त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे मागीलवर्षीच्या अहवालावरून समोर आले़ पथकाला कोणीच सापडत नाही़ अधिकारी कारवाईला गेल्यास त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात़ उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांच्यावरील हल्ला हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे़ अधिकाऱ्यांवरील वाढते हल्ले पाहता वाळूतस्करांवर प्रशासनाचा वचक नसल्याचे उघड झाले असून, हे पथक नेमके करतात काय हा प्रश्न अनुत्तरित आहे़ वाळू साठ्यांचे संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे, हे उघड आहे़ वाळूची विक्री करण्यातही प्रशासकीय पातळीवर कमालची उदासीनता आहे़ सरकारने वाळू लिलावाची प्रक्रिया सुलभ केली़ त्यामुळे मुदतीत लिलाव होणे अपेक्षित होते़ मात्र स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लिलाव प्रक्रियाच लांबणीवर पडली आहे़ जिल्हा गौण खनिज विभागाने ४९ पात्र वाळू साठ्यांच्या लिलावाचा प्रस्ताव तयार केला़ मात्र ऐनवेळी पर्यावरण समितीच बरखास्त करण्याची नामुष्की ओढावली़ या समितीच्या मंजुरीनंतर लिलाव काढावेत, असे संकेत आहेत़ ही समिती स्थापनेसाठी अर्ज मागविले असून, समिती स्थापन झाल्यानंतरच वाळू लिलाव प्रक्रियेला मुहूर्त मिळणार आहे़ तोपर्यंत नदीतीत वाळू राहील का, हा खरा प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)