शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
Kamchatka Earthquake : ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
3
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
4
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
5
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
6
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
7
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
8
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
9
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
11
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
12
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
13
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
14
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
15
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
16
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
17
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
18
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
19
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
20
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!

पर्यावरण समितीअभावी वाळू लिलाव लांबणीवर

By admin | Updated: October 17, 2016 01:06 IST

अहमदनगर : पर्यावरण तज्ज्ञ समितीअभावी वाळू लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे़ ग्रामपंचायतींची मंजुरी मिळूनही प्रस्ताव लालफितीत अडकले असून,

अहमदनगर : पर्यावरण तज्ज्ञ समितीअभावी वाळू लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे़ ग्रामपंचायतींची मंजुरी मिळूनही प्रस्ताव लालफितीत अडकले असून, वाळूमाफियांना रान मोकळे आहे़ बेकायदा उपशावरून अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे़ या हल्ल्यांतून प्रशासन धडा घेणार की नदीपासून ते लिलावापर्यंत केवळ कागदी घोडे नाचवित राहणार हा खरा प्रश्न आहे़गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला़ त्यामुळे नद्या वाहत्या झाल्या़ पाण्याबरोबर वाळूही वाहून आली़ या वाळूवर वाळूतस्करांचा डोळा आहे़ अधिकृत लिलाव न घेताच वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा कधीचाच सुरू झाला आहे़ उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, गोदावरी आणि प्रवरा नदी पात्रात उत्तम प्रतीची वाळू आहे़ या वाळूला सोन्याचा भाव आहे़ पावसामुळे बांधकाम क्षेत्रातील मंदीही काहीशी दूर झाली आहे़ बांधकाम व्यावसायिकांकडून वाळूची मागणी वाढली आहे़ मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत़ या वाळूमाफियांना रोखण्यासाठी प्रशासनाकडे सक्षम यंत्रणा नाही़ जिल्हास्तरीय पथक नियुक्त केले आहे़ मात्र हे पथकही नावालाच आहे़ पथक कारवाईसाठी गेले़ पण त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे मागीलवर्षीच्या अहवालावरून समोर आले़ पथकाला कोणीच सापडत नाही़ अधिकारी कारवाईला गेल्यास त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात़ उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांच्यावरील हल्ला हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे़ अधिकाऱ्यांवरील वाढते हल्ले पाहता वाळूतस्करांवर प्रशासनाचा वचक नसल्याचे उघड झाले असून, हे पथक नेमके करतात काय हा प्रश्न अनुत्तरित आहे़ वाळू साठ्यांचे संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे, हे उघड आहे़ वाळूची विक्री करण्यातही प्रशासकीय पातळीवर कमालची उदासीनता आहे़ सरकारने वाळू लिलावाची प्रक्रिया सुलभ केली़ त्यामुळे मुदतीत लिलाव होणे अपेक्षित होते़ मात्र स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लिलाव प्रक्रियाच लांबणीवर पडली आहे़ जिल्हा गौण खनिज विभागाने ४९ पात्र वाळू साठ्यांच्या लिलावाचा प्रस्ताव तयार केला़ मात्र ऐनवेळी पर्यावरण समितीच बरखास्त करण्याची नामुष्की ओढावली़ या समितीच्या मंजुरीनंतर लिलाव काढावेत, असे संकेत आहेत़ ही समिती स्थापनेसाठी अर्ज मागविले असून, समिती स्थापन झाल्यानंतरच वाळू लिलाव प्रक्रियेला मुहूर्त मिळणार आहे़ तोपर्यंत नदीतीत वाळू राहील का, हा खरा प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)