शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

प्राध्यापक निघाले विद्यार्थ्यांच्या शोधात

By admin | Updated: June 29, 2014 00:29 IST

अहमदनगर : काही खास महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी संस्थाध्यक्ष, आमदार-खासदारांच्या वशिल्याच्या चिठ्ठ्या मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे.

अहमदनगर : काही खास महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी संस्थाध्यक्ष, आमदार-खासदारांच्या वशिल्याच्या चिठ्ठ्या मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे काही महाविद्यालयातील प्राध्यापकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. नगरमधील काही प्राध्यापक व प्राचार्यही विद्यार्थी मिळवण्यासाठी खेड्यात चकरा मारीत आहेत. त्यांची वाट्टेल ती ‘डिमांड’ पुरवण्यासाठीही त्यांची तयारी आहे. गावोगावी जाऊन संबंधित प्राध्यापक महाशय ही ‘स्किम’ पालक आणि विद्यार्थ्यांच्या गळी उतरवित आहेत.सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेने आखून दिलेल्या तारखेनुसार प्रवेश अर्ज भरले गेले आहेत. नगर शहरातील काही महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. त्यांच्याकडील अर्जविक्रीवरून हे निदर्शनास आले आहे. बहुतांशी विद्यार्थी हे मोठ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. विशेषत: कनिष्ठ महाविद्यालयांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांमध्ये ‘सरप्लस’(अतिरिक्त) ठरण्याची भीती आहे. पटसंख्येच्या नवीन नियमाने त्यांची गोची केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनाही विद्यार्थी न मिळाल्याने तुकडी उडण्याची तसेच संस्थेत आपण सरप्लस होण्याची भीती आहे. या भीतीने ते विद्यार्थ्यांच्या शोधात निघाले आहेत.काय आहेत कारणे...खेड्यातील विद्यार्थी शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. शहरातील विद्यार्थ्यांचाही ठराविक महाविद्यालयांकडेच ओढा आहे. माध्यमिक शाळेला जोडून असलेल्या काही कनिष्ठ महाविद्यालयात एकतर शिक्षणाची गुणवत्ता नाही. दुसरे म्हणजे ग्रामीण भागात खासगी शिकवणीची सोय नाही. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीकडे जाणारे विद्यार्थी कॉलेज सुरू असतानाच सीईटीचा अभ्यास करतात. विद्यार्थिंनींसाठी तालुक्याच्या ठिकाणी चांगले होस्टेल नसणे. या कारणांमुळे त्यांची पसंती शहरातील महाविद्यालयांना आहे.-खासगी क्लासचालक.अशी आहे स्किम...तुम्ही आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्या. तुमचा शहरात जाण्याचा ताण वाचेल. प्रवेश शुल्कात सवलत दिली जाईल. परीक्षा शुल्कही मोजकेच आकारले जाईल. इतर कोणताही छुपा खर्च लावला जाणार नाही. प्रवेश घेऊन कॉलेजमध्ये अधून-मधून आले तरी चालेल. परीक्षेवेळी आम्ही सर्वोतोपरी मदत करू. शिवाय पास करून देण्याची गॅरंटी. शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनीही हा ‘फंडा’ अवलंबिला आहे.जागेचा लेखाजोखाजिल्ह्यात ७१४ तुकड्या आहेत. त्यातून ६३ हजार ६०० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. त्यात स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्या १ हजार ५०० जागा वाढीव आहेत. या वर्षी पुन्हा त्यात ७ हजार जागांची भर पडली आहे. अशा एकूण ७२ हजार १०० जागा आहेत. दहावीचे ६९ हजार ८८ विद्यार्थी होते. त्यातील ६४ हजार १८३ उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षांर्थीं(रिपिटर्स)पैकी १ हजार १९१ उत्तीर्ण झाले. या उत्तीर्णां पैकी पॉलीटेक्निक, आयटीआयला जाणाऱ्यांचेही मोठे प्रमाण आहे. त्यामुळे आणखीच जागा शिल्लक राहतील. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हे बाजारू गणित निर्माण झाले आहे. त्यातून वरील अजब ‘स्किम’ने जन्म घेतलाय.विद्यार्थ्यांची ‘खोगिरभरती’‘खास’ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी रांगा लावतात. तेथे खास दर आकारणी होते. पालकही पाल्यांसाठी ‘देणगी’ देतात. या महाविद्यालयांमध्ये तुकडीत ठरवून दिलेल्या संख्येपेक्षाही जास्त विद्यार्थी भरले जातात. या भरती प्रक्रियेमुळे संबंधित महाविद्यालयात केवळ खोगिरभरती वाढते.प्रवेशाचे वेळापत्रक१९ ते २६ जून प्रवेश अर्ज विक्री२७ व २८ जून कॉलेजकडून प्राप्त अर्जाची नोंदणी३० जून प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी२ जुलै अंतिम गुणवत्ता यादी३ ते ५ जुलै गुणवत्तायादीप्रमाणे प्रवेश ७ ते १४ जुलै प्रतीक्षा यादी १ ते ३ प्रसिद्ध करणे.१५ जुलै प्रतीक्षायादीनुसार प्रवेश१६ ते १९ जुलै गुणवत्तेनुसार प्रवेश