शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

‘पंचायत राज’मुळे लोकशाही बळकट

By admin | Updated: August 14, 2014 01:49 IST

नेवासा : पंचायत राज व्यवस्थेने देशाची लोकशाही बळकट करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी केले.

नेवासा : पंचायत राज व्यवस्थेने देशाची लोकशाही बळकट करण्याचे काम केले. आम्ही देखील पंचायत राज व्यवस्थेमध्ये २० वर्षे काढली. त्यामुळे पाळमुळं घट्ट झाली. कितीही संकटे आली तरी आम्ही त्यामुळे डगमगलो नाही. नेवासा पंचायत समितीची नूतन इमारत ही नेवासा शहराच्या वैभवात भर घालणारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी केले. राजकारणामध्ये डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. इमारत उद्घाटनावरून मंगळवारी झालेला प्रकार दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त कली.नेवासा येथील पंचायत समितीच्या सुमारे १ कोटी ९८ लाख खर्चाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.१३) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेप्रसंगी यशवंतराव गडाख हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गडाख म्हणाले की, पंचायत राज व्यवस्थेने देशाला व महाराष्ट्राला खूप मोठी माणसे दिली. मंत्रिमंडळातील मंत्री हे देखील पंचायत राज व्यवस्थेतूनच गेले. त्यांना प्रशासनाचा अनुभव होता म्हणून ते यशस्वीही झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीने समाजाचे भान ठेवूनच काम केले पाहिजे. आम्ही काम करत असताना आम्हीही विरोधकांना सामोरे गेलो, पण ते विचाराने, कधी कुणाचा द्वेष केला नाही की, भांडलो नाही. राजकारणातही पथ्ये व संस्कृती पाळली गेली पाहिजे. जुन्या पिढीने आम्हाला बाळकडू दिले म्हणूनच आम्ही संस्था जपतो व चांगल्या पद्धतीने चालवितो. चांगल्या कामाला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असा मौलिक सल्ला देऊन पाटपाण्याच्या प्रश्नासंदर्भात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी नरेंद्र घुले पाटील म्हणाले, आमदार शंकरराव गडाख यांनी विकासाची दालने जनतेसाठी खुली करण्यासाठी काम केले. तरुणांना प्रोत्साहित करून विकासाचा गाडा चालविण्याचा प्रयत्न अहोरात्र केला. जनतेशी प्रामाणिक राहून काम केले म्हणून मोठे यश संपादन केले असल्याचे गौरवोद्गार आ. गडाख यांच्याबद्दल काढले. आ.शंकरराव गडाख म्हणाले, मी आमदार झाल्यापासून कधीही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जाऊन लुडबुड केली नाही. ते मलाही पसंत नाही. पंचायत समिती प्रांगणात उभारलेली प्रशासकीय इमारत जिल्ह्यात कुठेही नाही. पाठपुरावा करून काम करीत राहणे हेच माझे काम असल्याने निवडणूक होईपर्यंत विरोधकांबद्दल मी कधीही अपशद्ब वापरणार नाही. जेवढे विरोधक शिव्या देतील तेवढे माझे काम मी करीतच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार धरणाचे पाणी राखीव केले आहे. भांडून रोटेशन आणण्याचा माझा प्रयत्न राहणार असून, अडचणीवर मार्ग काढून पाणी आणून दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची भाषणे झाली. सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास उपसभापती कारभारी चेडे, भैय्यासाहेब देशमुख, विश्वासमामा गडाख, जि.प. सदस्य सुनील गडाख, सा.बां. उपाभियंता संजीवकुमार कोकणे, काशिनाथ नवले, निवृत्ती दातीर, कडूबाळ कर्डिले, रामभाऊ जगताप, नंदकुमार पाटील, शंकरराव लोखंडे, शिवाजीराव टेकावडे, तुकाराम मिसाळ, अण्णासाहेब सोनवणे, अशोक चौधरी, अ‍ॅड.देसाई देशमुख, भाऊसाहेब मोटे, भागिरथी शिंदे, विमलताई बहिरट, सविता शिंदे, काकासाहेब शिंदे, राजेंद्र गुगळे, शंकरराव भारस्कर, नानासाहेब तुवर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. के. एच. वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले. पी.आर. जाधव यांनी आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)