शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

जिल्ह्यात फक्त २० टक्के जलसाठा

By admin | Updated: April 24, 2016 23:18 IST

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठला आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही़

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठला आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही़ एकमेव मुळा व भंडारदर धरणात पाणीसाठा शिल्लक आहे़ धरणांवरील उपसा वाढल्याने तेथील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, दोन्ही धरणांत फक्त २० टक्के जलसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे पुढील जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची चिंता नाही़ मात्र, त्यानंतरही पाऊस पडलाच नाही तर काय, अशी चिंता जिल्ह्याला लागून आहे़ गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील पावसाच्या सरासरीने शंभरी ओलांडली नाही़ पावसाअभावी शेती व्यवसाय उद्धवस्त झाला आहे. दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे़ यंदाचे दुष्काळाचे तिसरे वर्ष आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्यांची भटकंती सुरू आहे़ पाणी पातळी खोल गेल्याने गावातील उद्भव कधीच कोरडे पडले आहेत़ पाणी योजनांनाही घरघर लागली आहे़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर आहे़ गावोगावचे तलाव भरण्यासाठी मुळा व भंडारदरातून पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले़ उत्तर नगर जिल्ह्यासाठी मुळातून दक्षिणेतील चार तालुक्यांसाठी कुकडी प्रकल्पातून पाणी आणले़ त्यामुळे उद्भवात पाणी आले़ त्यातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे़ पाऊस वेळेवर न पडल्यास उद्भव भरण्यासाठी पुन्हा सोडावे लागेल, अशी शक्यता आहे़ मात्र मुळा व भंडारदरात २० टक्के पाणी साठा आहे़ त्यामुळे वेळेवर पाऊस न पडल्यास धरणांतील मृतसाठ्यातून पाणी उपसण्याची वेळ ओढावू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढली आहे़ गावांत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची संख्या घटली आहे़ बहुतांश लोक वाड्या-वस्त्यांवर राहतात़ त्यांना पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ प्रशासनाकडून २९३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर सात पाणी योजनाही पूर्ण केल्या गेल्या़ तसेच ४१ पाणी योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे़ याशिवाय ४८० विंधन विहिरी प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या असून, त्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे़ मात्र त्यांना पाणी कमी पडू लागल्याने धरणांतून पाण्याची मागणी होत आहे़ त्यामुळे पुढील काळात धरणांवर अवलंबून असणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)यंदा पाणीसाठा नऊ टक्क्यांनी घटलामागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा ९ टक्के कमी आहे़ मागीलवर्षी मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात २९़ ९९ टक्के पाणीसाठा होता़ पाणीसाठा (टीएमसीमध्ये)भंडारदरा- १, ५६९, मुळा-६,६३८, निळवंडे-७०७.