शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

जिल्ह्यात फक्त २० टक्के जलसाठा

By admin | Updated: April 24, 2016 23:18 IST

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठला आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही़

अहमदनगर : सततच्या दुष्काळाने पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठला आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही़ एकमेव मुळा व भंडारदर धरणात पाणीसाठा शिल्लक आहे़ धरणांवरील उपसा वाढल्याने तेथील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, दोन्ही धरणांत फक्त २० टक्के जलसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे पुढील जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची चिंता नाही़ मात्र, त्यानंतरही पाऊस पडलाच नाही तर काय, अशी चिंता जिल्ह्याला लागून आहे़ गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील पावसाच्या सरासरीने शंभरी ओलांडली नाही़ पावसाअभावी शेती व्यवसाय उद्धवस्त झाला आहे. दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे़ यंदाचे दुष्काळाचे तिसरे वर्ष आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्यांची भटकंती सुरू आहे़ पाणी पातळी खोल गेल्याने गावातील उद्भव कधीच कोरडे पडले आहेत़ पाणी योजनांनाही घरघर लागली आहे़ त्यामुळे सर्वांची भिस्त जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर आहे़ गावोगावचे तलाव भरण्यासाठी मुळा व भंडारदरातून पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले़ उत्तर नगर जिल्ह्यासाठी मुळातून दक्षिणेतील चार तालुक्यांसाठी कुकडी प्रकल्पातून पाणी आणले़ त्यामुळे उद्भवात पाणी आले़ त्यातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे़ पाऊस वेळेवर न पडल्यास उद्भव भरण्यासाठी पुन्हा सोडावे लागेल, अशी शक्यता आहे़ मात्र मुळा व भंडारदरात २० टक्के पाणी साठा आहे़ त्यामुळे वेळेवर पाऊस न पडल्यास धरणांतील मृतसाठ्यातून पाणी उपसण्याची वेळ ओढावू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढली आहे़ गावांत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची संख्या घटली आहे़ बहुतांश लोक वाड्या-वस्त्यांवर राहतात़ त्यांना पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे़ प्रशासनाकडून २९३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर सात पाणी योजनाही पूर्ण केल्या गेल्या़ तसेच ४१ पाणी योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे़ याशिवाय ४८० विंधन विहिरी प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या असून, त्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे़ मात्र त्यांना पाणी कमी पडू लागल्याने धरणांतून पाण्याची मागणी होत आहे़ त्यामुळे पुढील काळात धरणांवर अवलंबून असणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)यंदा पाणीसाठा नऊ टक्क्यांनी घटलामागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा ९ टक्के कमी आहे़ मागीलवर्षी मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात २९़ ९९ टक्के पाणीसाठा होता़ पाणीसाठा (टीएमसीमध्ये)भंडारदरा- १, ५६९, मुळा-६,६३८, निळवंडे-७०७.