शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

मंत्री तनपुरेंसह आयुक्त, उपअभियंत्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

अहमदनगर : महापालिकेतील नगररचना विभागातील उपअभियंता कल्याण बल्लाळ यांना पदनावत करण्याबाबतच्या कार्यवाहीला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिली ...

अहमदनगर : महापालिकेतील नगररचना विभागातील उपअभियंता कल्याण बल्लाळ यांना पदनावत करण्याबाबतच्या कार्यवाहीला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिली होती. या स्थगितीला सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणी खंडपीठाने राज्यमंत्री तनपुरेंसह राज्याचे प्रधान सचिव, महापालिका आयुक्त आणि उपअभियंता बल्लाळ यांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी १६ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

अहमदनगर महापालिकेतील उपअभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याबाबतच्या कार्यवाहीस नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिली होती. त्याला शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. त्याची सुनावणी १६ जूनला मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर झाली. या सुनावणीत याचिकाकर्ते शेख यांच्या वतीने ॲड.आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड.अर्जुन लूक यांनी साहाय्य केले. सरकारच्या वतीने ॲड.व्ही.एन. पाटील-जाधव यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महापालिका आयुक्त कल्याण बल्लाळ यांच्यासह राज्यमंत्री तनपुरे व राज्याच्या प्रधान सचिवांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, राज्यमंत्री तनपुरे, प्रधान सचिव यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सुनावणीला हजेरी लावली.

---

अशी आहे पार्श्वभूमी

महापालिकेतील उपअभियंता कल्याम बल्लाळ हे १९९५ साली तत्कालीन नगरपरिषदेमध्ये सहओव्हरसीयर या पदावर रुजू झाले. सन २००० मध्ये कनिष्ठ अभियंता हे पद भटक्या जमातीसाठी सरळ सेवेने भरती करण्यासाठी राखीव होते. मात्र, या पदावर बल्लाळ यांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली. वास्तविक बल्लाळ अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे असतानाही दिलेली पदोन्नती बेकायदेशीर होती. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी २०११ पासून पाठपुरावा केला होता. याची शासनाने दखल घेऊन २८ फेब्रुवारी, २०२० रोजी बल्लाळ यांची पदावनती करण्याचा आदेश दिला होता. मात्र, आयुक्तांनी या आदेशाची कार्यवाहीच केली नाही, तसेच बल्लाळ यांनी आदेशाविरुद्ध राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. त्याला तनपुरे यांनी स्थगिती दिली होती.