शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

राष्ट्रीय मान्यता गोठविण्याची राष्ट्रवादीला नोटीस

By admin | Updated: June 20, 2014 00:42 IST

सुधीर लंके, अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत.

सुधीर लंके, अहमदनगरलोकसभा तसेच विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये आवश्यक असणारी मते व जागा मिळालेल्या नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा उडणार हे जवळपास निश्चित आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी असलेल्या विविध अटींची पूर्तता होत नसल्याने या पक्षांचा हा दर्जा धोक्यात आला असल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’ने २१ मे रोजी आकडेवारीसह प्रकाशित केले होते. ‘लोकमत’चा हा अंदाज बरोबर ठरला आहे. निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव के.एफ. विलफर्ड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षांना नोटीसा बजावण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. राष्ट्रीय मान्यता गोठविण्यात का येऊ नये? यासंदर्भात या पक्षांचे म्हणणे मागविण्यात आले असून ते सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल असे ते म्हणाले. या सुनावणीच्या प्रक्रियेला साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय होईल. राष्ट्रीय मान्यता गोठल्यास राष्ट्रवादी हा राज्यात शिवसेना, मनसे या पक्षांसारखाच केवळ राज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह राज्यात कायम राहील परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून मतपत्रिकेवर असणारे वरचे स्थान त्यांना मिळणार नाही. बसपा व भाकपा या पक्षांना महाराष्ट्रात राज्य पक्ष म्हणूनही दर्जा नाही. त्यामुळे या पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीत आपले ‘हत्ती’ व ‘विळाकणीस’ हे चिन्ह गमवावे लागणार आहे. चिन्ह हवे असेल तर त्यांना निवडणूक आयोगाकडे तसा अर्ज करावा लागेल. तरच ते त्यांना मिळू शकेल. लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळाली नसून राष्ट्रवादीला सहा तर भाकपाला अवघी एक जागा मिळाली आहे. बसपाचा केवळ मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व उत्तराखंडमध्ये तर भाकपाला केवळ केरळ व तामिळनाडूत राज्य पक्षांचा दर्जा उरला आहे. तृणमूलची राष्ट्रीय मान्यतेची संधी हुकली तृणमूल काँग्रेसला सध्या अरुणाचल प्रदेश, मणिपूर व पश्चिम बंगालमध्ये राज्य पक्षांचा दर्जा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्रिपुरातही त्यांना राज्य पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. चार राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा असेल तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तृणमूलला ही संधी होती. परंतु अरुणाचल विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाची काहीच कामगिरी नसल्याने तेथे त्यांचा राज्य पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. निवडणूक आयोग याबाबत तपासणी करत आहे. नागालँडमध्येही अडचणराष्ट्रीय मान्यता धोक्यात आलेल्या राष्ट्रवादीला सध्या महाराष्ट्र व नागालँड या दोन ठिकाणीच राज्य पक्षाचा दर्जा उरला आहे. नागालँड विधानसभेच्या २०१३ च्या निवडणुकीत या पक्षाला चार जागा व सहा टक्के मते मिळाली होती. परंतु नुकतेच यातील तीन आमदार भाजपात गेल्याने येथील राज्य पक्ष म्हणून असलेला दर्जाही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे ‘नॅशनॅलिस्ट’ म्हणविणारा हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता उरण्याचा धोका आहे.