शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

हौशी नगरकर गेले फिरायला...

By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST

अहमदनगर : शिर्डी, भंडारदरा, कळसुबाई, मढी, सिद्धटेक आदी निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाची ठिकाणे असलेल्या नगर जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात जाणार्‍या हौशी नगरकरांचीही संख्या काही कमी नाही.

अहमदनगर : शिर्डी, भंडारदरा, कळसुबाई, मढी, सिद्धटेक आदी निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाची ठिकाणे असलेल्या नगर जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यात जाणार्‍या हौशी नगरकरांचीही संख्या काही कमी नाही. धकाधकीच्या जीवनात असलेला कामाचा तणाव, कुटुंबातील अंतर्गत कलह, कार्यालयातील दगदग यातून सुटका करून घेत मोकळ्या वातावरणात बागडणारे हौशी नगरकर वर्षातून किमान दोनवेळा पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. आनंदाचे दोन क्षण जगण्याकरिता पर्यटनाला जाण्याचा पर्याय सर्वात जवळचा वाटतो आहे. कामाचा ताण असलेला नोकरदार आणि व्यापारीवर्ग वर्षातून २ ते ३ वेळा सहकुटुंब पर्यटनाला जाण्यावर भर देत आहे. टूर प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट करून देणार्‍या कंपन्या मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. परंतु तरीही कुटुंबासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत प्लॅनिंग करुन पर्यटनाला जाण्यावर अनेकांकडून भर दिला जात आहे. २पर्यटन कंपन्यांतर्फे टूरला जाणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवविवाहितांची संख्या सवार्धिक आहे. भारताबाहेर जाणारे पर्यटक पर्यटन कंपन्यांतर्फे जात आहेत. अंतर्गत पर्यटनाला इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्लॅनिंग करून बाहेर पडत आहे. सहकुटुंब सामान्यांमध्ये पर्यटनाविषयी असलेली ओढ जाणून घेण्याचा 'लोकमत'ने प्रयत्न केला. त्यातून ६५ टक्के नागरिक वषार्तून दोन ते तीन वेळा पर्यटनाला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, वैयक्तिक किंवा मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनाला जाण्यापेक्षा सहकुटुंब जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. शनिवार, रविवार असे जोडून पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. असे दोन दिवस जोडून चार किंवा पाच दिवसांचे पर्यटन प्लॅनिंग करण्यावरच नगरकरांचा भर आहे. ३कामाच्या ताणातून वेळ काढून माइंड फ्रेश करण्याचा हा फंडा प्रत्येकालाच उपयुक्त ठरत आहे. बाहेरगावी जाऊन आल्यानंतर काम करताना मिळणारी शक्ती कित्येक दिवस साथ देत असल्याने पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. व्यापारीवगार्चे व्यवहार बुधवारी बंद असतात. त्यामुळे व्यापारी त्या दिवशी जवळचे पर्यटनस्थळ निवडतात. नगर ते पुणे आणि पुणे येथून जवळ असलेल्या पर्यटनस्थळांना व्यापारी वर्गाने पसंती दिली आहे. पर्यटनकरिता तीन महिन्यांतून २ ते ३ दिवस काढण्याचा प्रयत्न अनेक जण करीत असल्याचे दिसून आले आहे. तर, लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्याकरिता आठवडाभर वेळ ठेवणारा वर्गही थोड्या प्रमाणात आहे. धकाधकीच्या जीवनात असलेले कामाचे टेन्शन आणि कु टुंबातील अंतर्गत कलहांचा त्रास यातून मोकळ्या वातावरणात आनंदाचे दोन क्षण जगण्याकरिता पर्यटनाला जाण्याचा पर्याय सध्या निवडला जात आहे. विद्यार्थिवगार्पेक्षा रोजच्या कामाचा ताण असलेला नोकरदार आणि व्यापारीवर्ग वषार्तून २ ते ३वेळा सहकुटुंब पर्यटनाला जाण्यावर भर देत असल्याचे दिसून आले आहे. तरुण वर्गात उत्सुकता, कुतूहल, अभ्यास, निसर्गज्ञान, इतिहासशिक्षण यानुसार पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. गणपतीपुळे, पावस, अक्कलकोट, गोंदवले, औंध, महाबळेश्वर, लोणावळा, मालवण-सिंधुदुर्ग, आनंदसागर अशा राज्यांतर्गत ठिकाणांना पसंती दिली जात आहे.