शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

आता केशरी रेशनकार्डधारकांनाही धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

अहमदनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण सवलतीच्या दरात जूनमध्ये होणार ...

अहमदनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण सवलतीच्या दरात जूनमध्ये होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ निर्बंध लागू करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. याच योजनेतील धान्य मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने आता केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात हे धान्य दिले जाणार आहे.

राज्य सरकारने अन्नधान्य मोफत वाटण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या लॅाकडाऊनमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब, अंत्योदय योजनेसोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रति व्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. बऱ्याच जिल्ह्यांत आधीच्या मोफत योजनेतील धान्य शिल्लक असून, धान्याची उचलही झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच शासनाने आता हे धान्य केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात देण्याचे जाहीर केले आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी २९२ मेट्रिक टन तांदूळ तर ४३९ मेट्रिक टन गहू असे ७३१ मेट्रिक टन एकूण धान्य उपलब्ध होणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

-----------------------

जिल्ह्यातील रेशनकार्डधारक

अंत्योदय योजना- ८८,६१८

प्राधान्य कुटुंब-६,०५,५२४

केशरी-३,३५,६६०

-------------

काय मिळणार?

प्रतिमाणसी

गहू-१ किलो (८ रुपये किलो)

तांदूळ-१ किलो (१२ रुपये किलो)

----------

बीपीएलच्या ६ लाख कुटुंबांना मिळणार लाभ

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा प्राधान्य कुटुंबात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या ६ लाख ५ हजार कुटुंबांतील २६ लाख ४७ हजार १४४ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

-----------

केशरीच्या साडेतीन लाख कुटुंबांना लाभ

जिल्ह्यात सध्यस्थितीला ३ लाख ३५ हजार ६६० इतके केशरी कार्डधारक आहेत. या कार्डांनुसार १४ लाख ५७ हजार ६६८ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या काळात केशरी कार्डधारकांना प्रथमच सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. त्यामुळे आता कोणीही उपाशी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ या प्रमाणे दोन किलो धान्य सवलतीच्या दराने म्हणजे गहू ८ रुपये प्रतिकिलो दराने आणि तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने दिला जाणार आहे.

-------------

डमी आहे.

फोटो- २७ रेशन दुकान