शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

आता केशरी रेशनकार्डधारकांनाही धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

अहमदनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण सवलतीच्या दरात जूनमध्ये होणार ...

अहमदनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण सवलतीच्या दरात जूनमध्ये होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ निर्बंध लागू करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. याच योजनेतील धान्य मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने आता केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात हे धान्य दिले जाणार आहे.

राज्य सरकारने अन्नधान्य मोफत वाटण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या लॅाकडाऊनमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब, अंत्योदय योजनेसोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात प्रति व्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. बऱ्याच जिल्ह्यांत आधीच्या मोफत योजनेतील धान्य शिल्लक असून, धान्याची उचलही झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच शासनाने आता हे धान्य केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात देण्याचे जाहीर केले आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी २९२ मेट्रिक टन तांदूळ तर ४३९ मेट्रिक टन गहू असे ७३१ मेट्रिक टन एकूण धान्य उपलब्ध होणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

-----------------------

जिल्ह्यातील रेशनकार्डधारक

अंत्योदय योजना- ८८,६१८

प्राधान्य कुटुंब-६,०५,५२४

केशरी-३,३५,६६०

-------------

काय मिळणार?

प्रतिमाणसी

गहू-१ किलो (८ रुपये किलो)

तांदूळ-१ किलो (१२ रुपये किलो)

----------

बीपीएलच्या ६ लाख कुटुंबांना मिळणार लाभ

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा प्राधान्य कुटुंबात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखाली असलेल्या ६ लाख ५ हजार कुटुंबांतील २६ लाख ४७ हजार १४४ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

-----------

केशरीच्या साडेतीन लाख कुटुंबांना लाभ

जिल्ह्यात सध्यस्थितीला ३ लाख ३५ हजार ६६० इतके केशरी कार्डधारक आहेत. या कार्डांनुसार १४ लाख ५७ हजार ६६८ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या काळात केशरी कार्डधारकांना प्रथमच सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. त्यामुळे आता कोणीही उपाशी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ या प्रमाणे दोन किलो धान्य सवलतीच्या दराने म्हणजे गहू ८ रुपये प्रतिकिलो दराने आणि तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने दिला जाणार आहे.

-------------

डमी आहे.

फोटो- २७ रेशन दुकान