शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अपंगांच्या रेशीमगाठींना सरकारचे कन्यादान

By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर अपंगांशी रेशीमगाठी जुळल्यानंतर त्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी राज्य सरकार अपंग व अपंग नसलेल्या अशा जोडप्याच्या रेशीमगाठींसाठी ५० हजारांचे कन्यादान करणार आहे.

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूरअपंगांशी रेशीमगाठी जुळल्यानंतर त्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी राज्य सरकार अपंग व अपंग नसलेल्या अशा जोडप्याच्या रेशीमगाठींसाठी ५० हजारांचे कन्यादान करणार आहे.अपंगांना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे कौटुंबिक जीवन जगता यावे, यासाठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन दिल्यास अपंगांशी अपंग नसलेल्या व्यक्ती लग्नगाठ बांधण्यास प्रोत्साहीत होतील, यासाठी आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. १ एप्रिल २०१४ या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहित होणाऱ्या जोडप्यांना ही योजना लागू केली आहे. किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या जोडीदाराशी विवाह केल्यास अथवा अपंग नसलेल्या वधू किंवा वराने अपंग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अर्थसहाय्य मिळेल. त्यानुसार २५ हजार रूपयांचे बचतप्रमाणपत्र, २० हजार रूपये रोख, संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदीसाठी ४५०० रूपये ,स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी ५०० रूपये असे एकूण ५० हजार रूपये मिळणार आहे. मुंबईत सहायक समाजकल्याण आयुक्त, तर इतर जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत योजना राबविली जाईल़ त्यासाठी या कार्यालयातील नमुना अर्ज भरून द्यावा लागणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात प्राप्त होणारे अर्ज, त्या आर्थिक वर्षात वर्षातून दोनदा निकाली काढले जाणार आहेत. १ एप्रिलपासून होणार अंमलबजावणीया योजनेंतर्गत १ एप्रिल २०१४ पासून लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार असून निधीच्या उपलब्धतेनंतरच योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. लाभार्थ्याने योजनेचा दोनदा लाभ घेऊ नये, यासाठी लाभार्थ्यांनी सादर केलेला विवाह नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अपंग प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीच्या मागील बाजूस ‘अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेले आहे’ असा शिक्का मारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे या लाभार्थ्यांची माहिती नोंदवहीत ठेवली जाणार आहे. अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाणार आहे.