शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

दरोडेखोरांची टोळी गजाआड

By admin | Updated: September 8, 2014 00:34 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेगाडीचा वेग कमी झालेला असताना प्रवाशांचा मोबाईल हिसकावणे, पाकीटमारी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी जेरबंद केली.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेगाडीचा वेग कमी झालेला असताना प्रवाशांचा मोबाईल हिसकावणे, पाकीटमारी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी रात्री जेरबंद केली. त्यांचा साथीदार पळून गेला असून, आरोपींकडून १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगरात फत्ते करण्यात आली.त्यांच्या जवळ मिरची पावडरच्या दोन पुड्या, एक धारदार चाकू, एक सुरा तसेच वेगवेगळ्या कंपन्यांचे १८ मोबाईल हँडसेट, असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.क्रांती कांतीलाल भोसले (२५, रा. लाल माती, भावसिंगपुरा), रमेश भगवान शिंदे (२५, रा. राजीवनगर), गोलू दगडू काळे (५०, रा. राजीवनगर), संजू गोलू काळे (२०, रा. लाल माती, भावसिंगपुरा), जितेंद्रकुमार अवधेशप्रसाद यादव (२०, रा. भावसिंगपुरा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेचा वेग मंद असतो. तेव्हा आरोपी हे प्रवाशांचा मोबाईल हिसकावून रेल्वेतून उडी मारून निघून जातात. तसेच काही जण प्रवाशांना दगड मारून लुटमार करतात, अशा प्रकारची माहिती मिळाली होती.दरम्यान, आरोपी क्रांती भोसले आणि त्याचे साथीदार जालाननगर परिसरातील अमृत कॉम्प्लेक्स येथे गुन्हा करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.त्याआधारे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, निरीक्षक आघाव, शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, नितीन मोरे, भीमराव आरके, अशोक नागरगोजे आदींनी आरोपींना वेढा घालून जेरबंद केले.