शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

छ. शरीफजींचा इतिहास नाभिकामुळे उजेडात!

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

इतिहासाचे वर्तमान : भातोडीत छत्रपतींच्या वारसांचा आज स्नेहमेळावा

अशोक निंबाळकर, अहमदनगरमराठेशाहीच्या इतिहासाची पायाभरणी अहमदनगरमध्ये निजामशाहीचा कारभार करीत असताना छत्रपती शहाजी आणि त्यांचे धाकटे बंधू शरीफजींनी केली. पुढे छत्रपतींची गादी चालविण्यासाठी माणकोजी, चौथे शिवाजीमहाराज शरीफजींच्या घराण्याने दिले. मात्र, शरीफजींचा पराक्रम आणि त्यांचे घराणे अंधारात राहिले. हा दुर्लक्षित इतिहास समोर आणण्यासाठी एक इतिहासप्रेमी नाभिकाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्याची पदरमोड सुरू आहे.नगर तालुक्यातील भातोडीतील रणसंग्रामात छ. शरीफजींना वीरगती मिळाली. तेथे त्यांची समाधी आहे. कालौघात शरीफजींचे विविध ठिकाणी विखुरलेले हे वंशज उद्या (सोमवारी) मूळ पुरूषासमोर नतमस्तक होत आहेत. छत्रपतींच्या घराण्यातील हे ‘गेट टुगेदर’ घडवून आणले आहे ते किशोर कदम या नाभिकाने.शरीफजींनी निजामशहाकडून लढताना मोठा पराक्रम केला. भातोडीतील तलावही त्यांनी फोडून मोगलांची दाणादाण उडवली होती. मात्र, त्यांना या लढाईत वीरमरण आले. मात्र, या लढाईने शहाजीराजांचे निजामशहाच्या दरबारात वजन वाढले. त्यामुळे पुढे त्यांना मराठेशाहीची बीजे रोवणे त्यांना सोपे गेले. शरीफजींचे घराणे त्यांच्या मृत्युनंतर दुर्लक्षित राहिले. छत्रपतींचे चुलते शरीफजींचा पराक्रम समाजासमोर यावा यासाठी कदम यांची धडपड सुरू आहे. त्यांची वंशावळ, इतिहास शोधून देण्यासाठी नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील अभिरक्षक मोडी तज्ज्ञ संतोष यादव यांनी मदत केली. त्यासाठी मोडीतील दस्तावेजही शोधले शहा शरीफ दर्ग्याचा नवसनगरच्या शहा शरीफ दर्ग्याला मालोजीराजे भोसले यांनी नवस केला. त्यानंतर त्यांना मुले झाल्याने एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी ठेवण्यात आले. शरीफजींचा इतिहास दुर्लक्षित राहिल्याने त्यांची समाधीही भग्न झाली. झाडाझुडूपात ती हरवून गेली होती. मध्यंतरी कदम यांनी जीवाशी ट्रेकर्सच्या मदतीने ती पूर्ववत केली. एवढा मोठा वारसा असूनही त्याकडे सरकारी यंत्रणा, राजकीय मंडळींचे लक्ष गेलेले नाही.मात्र शरीफजींचा दुर्लक्षित इतिहास शद्बबद्ध करण्यास यादव आणि कदम यांनी पुढाकार घेतला आहे. शरीफजी ते चौथे शिवाजीशरीफजींना त्रिंबकजी व व्यंकोजी ही दोन मुले होती. त्रिंबकजींचा मुलगा माणकोजी, माणकोजी यांच्यानंतर शहाजी. शहाजीला माणकोजी, संभाजी, मालोजी व स्वरूपजी अशी चार मुले. माणकोजी पुढे कोल्हापूरच्या गादीला शिवाजीराजे नावाने दत्तक गेले. या घराण्याला सावर्डे, टिटवे, सावरे ही गावे दत्तक दिल्याने काही वंशज तिथे गेले. चौथे शिवाजी हे सावर्डेकर भोसल्यांच्याच घराण्यातील होते. त्यांनाही नगरमध्ये वीरगती मिळाल्याने शरीफजींनंतर एक वर्तुळ पूर्ण झाले.