शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

छ. शरीफजींचा इतिहास नाभिकामुळे उजेडात!

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

इतिहासाचे वर्तमान : भातोडीत छत्रपतींच्या वारसांचा आज स्नेहमेळावा

अशोक निंबाळकर, अहमदनगरमराठेशाहीच्या इतिहासाची पायाभरणी अहमदनगरमध्ये निजामशाहीचा कारभार करीत असताना छत्रपती शहाजी आणि त्यांचे धाकटे बंधू शरीफजींनी केली. पुढे छत्रपतींची गादी चालविण्यासाठी माणकोजी, चौथे शिवाजीमहाराज शरीफजींच्या घराण्याने दिले. मात्र, शरीफजींचा पराक्रम आणि त्यांचे घराणे अंधारात राहिले. हा दुर्लक्षित इतिहास समोर आणण्यासाठी एक इतिहासप्रेमी नाभिकाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्याची पदरमोड सुरू आहे.नगर तालुक्यातील भातोडीतील रणसंग्रामात छ. शरीफजींना वीरगती मिळाली. तेथे त्यांची समाधी आहे. कालौघात शरीफजींचे विविध ठिकाणी विखुरलेले हे वंशज उद्या (सोमवारी) मूळ पुरूषासमोर नतमस्तक होत आहेत. छत्रपतींच्या घराण्यातील हे ‘गेट टुगेदर’ घडवून आणले आहे ते किशोर कदम या नाभिकाने.शरीफजींनी निजामशहाकडून लढताना मोठा पराक्रम केला. भातोडीतील तलावही त्यांनी फोडून मोगलांची दाणादाण उडवली होती. मात्र, त्यांना या लढाईत वीरमरण आले. मात्र, या लढाईने शहाजीराजांचे निजामशहाच्या दरबारात वजन वाढले. त्यामुळे पुढे त्यांना मराठेशाहीची बीजे रोवणे त्यांना सोपे गेले. शरीफजींचे घराणे त्यांच्या मृत्युनंतर दुर्लक्षित राहिले. छत्रपतींचे चुलते शरीफजींचा पराक्रम समाजासमोर यावा यासाठी कदम यांची धडपड सुरू आहे. त्यांची वंशावळ, इतिहास शोधून देण्यासाठी नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील अभिरक्षक मोडी तज्ज्ञ संतोष यादव यांनी मदत केली. त्यासाठी मोडीतील दस्तावेजही शोधले शहा शरीफ दर्ग्याचा नवसनगरच्या शहा शरीफ दर्ग्याला मालोजीराजे भोसले यांनी नवस केला. त्यानंतर त्यांना मुले झाल्याने एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी ठेवण्यात आले. शरीफजींचा इतिहास दुर्लक्षित राहिल्याने त्यांची समाधीही भग्न झाली. झाडाझुडूपात ती हरवून गेली होती. मध्यंतरी कदम यांनी जीवाशी ट्रेकर्सच्या मदतीने ती पूर्ववत केली. एवढा मोठा वारसा असूनही त्याकडे सरकारी यंत्रणा, राजकीय मंडळींचे लक्ष गेलेले नाही.मात्र शरीफजींचा दुर्लक्षित इतिहास शद्बबद्ध करण्यास यादव आणि कदम यांनी पुढाकार घेतला आहे. शरीफजी ते चौथे शिवाजीशरीफजींना त्रिंबकजी व व्यंकोजी ही दोन मुले होती. त्रिंबकजींचा मुलगा माणकोजी, माणकोजी यांच्यानंतर शहाजी. शहाजीला माणकोजी, संभाजी, मालोजी व स्वरूपजी अशी चार मुले. माणकोजी पुढे कोल्हापूरच्या गादीला शिवाजीराजे नावाने दत्तक गेले. या घराण्याला सावर्डे, टिटवे, सावरे ही गावे दत्तक दिल्याने काही वंशज तिथे गेले. चौथे शिवाजी हे सावर्डेकर भोसल्यांच्याच घराण्यातील होते. त्यांनाही नगरमध्ये वीरगती मिळाल्याने शरीफजींनंतर एक वर्तुळ पूर्ण झाले.