शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

विजेच्या लपंडावाने चारा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सपाटा सुरू आहे. कधी दुष्काळ तर कधी कोरोना तर कधी अतिवृष्टी तर कधी ...

शेती क्षेत्रावर सध्या नेहमीच संकटे येण्याचा सपाटा सुरू आहे. कधी दुष्काळ तर कधी कोरोना तर कधी अतिवृष्टी तर कधी प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी उन्हाळी हंगामात कोरोनामुळे पिके शेतातच पडून खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर गेल्या हंगामात पिके काढणीस आली आसतानाच अवकाळीचा फटका बसला. त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. द्राक्ष, डाळिंब, पेरू आदींच्या फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अधूनमधून येणाऱ्या ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करून हे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सध्या सुरू आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा जास्त अंत न पाहता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

......................

पाणी असून फायदा नाही

गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने यंदा मुबलक पाणी उपलब्ध असूनही विजेच्या लहरीपणाचा फटका शेती पिकांना बसत आहे. राहाता तालुक्यातील लोणी, दाढ, कोल्हार, बाभळेश्वर, पिंपरी निर्मळ परिसराला वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

.........

शेतात चारा पिकांबरोबर फळबागा आहेत. सध्या गेल्या महिनाभरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत असून पाण्याअभावी पिके करपू लागले आहे. वीज वितरण कंपनीने एकदाचा फॉल्ट शोधून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा आहे.

-बाबासाहेब दिघे, शेतकरी,

लोणी, ता. राहाता