शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

शेतकऱ्यांची बिबट्याशी झुंज

By admin | Updated: January 16, 2016 23:08 IST

राहुरी : मल्हारवाडी येथील शेतकरी संजय जाधव यांनी चार मिनिटे बिबट्याशी झुंज देऊन त्याला पळवून लावले.

राहुरी : शेतात फिरत असताना अचानक बिबट्याने अंगावर झडप घातली़ हा प्रसंग कथन करतानाही अंगावर शहारे येतात, परंतु मल्हारवाडी येथील शेतकरी संजय जाधव यांनी चार मिनिटे बिबट्याशी झुंज देऊन त्याला पळवून लावले. यात जाधव किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर व थोडेसे धाडस दाखवले म्हणून बचावलो, असे सांगताना जाधव यांचा अजूनही थरकाप उडतो.शुक्रवारी दुपारी राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील शेतकरी संजय लक्ष्मण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या डाळिंब शेतीची पाहणी करीत होते़ काही वेळेने त्यांना कडवळ शेताच्या दिशेने अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे ते थबकले. परंतु त्यांना सावरण्याच्या आधीच बिबट्याने जाधव यांच्या अंगावर झेप घेऊन त्यांना खाली पाडले. जमेल तेवढा प्रतिकार करण्यापलीकडे जाधव यांच्या हातात काहीच नव्हते. परंतु दुसऱ्याच क्षणी जाधव यांच्या हाताला जवळच पडलेले लोखंडी दाताळ लागले. त्याच्या आधारे त्यांनी बिबट्याचे तोंड दाबले. त्यामुळे बिबट्याने जाधव यांना काही वेळ सोडले. परंतु तो आणखी चवताळलेला होता. जाधव यांच्या दिशेने कूच करणार तोपर्यंत त्यांनी चोरात किंकाळी फोडली. त्यांच्या आवाजाने बिबट्या थोडा गांगरला. तो आवाज ऐकून जवळच्या शेतातच पाणी धरीत असलेले त्यांचे बंधू रामदास व भास्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विलास गागरे, जगन्नाथ गाडे हे शेजारीही धावले. सर्वजण बिबट्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून बिबट्याने ओढ्याच्या दिशेने पलायन केले. जखमी जाधव यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचारानंतर जाधव यांना घरी सोडण्यात आले असले तरी ते अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे़ वन विभागाचे चंद्रकांत गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़