शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

जिल्हा विभाजनासाठी समितीची स्थापना

By admin | Updated: June 30, 2014 00:33 IST

श्रीरामपूर : राज्यातील अहमदनगर, बीड, नाशिकसह राज्यातील इतरही जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्हा निर्मितीची मागणी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

श्रीरामपूर : राज्यातील अहमदनगर, बीड, नाशिकसह राज्यातील इतरही जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्हा निर्मितीची मागणी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी पुनर्रचना समितीची स्थापना केली आहे. ही समिती दोन महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विभागाच्या अतिरक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्रचना समिती नेमली आहे. या समितीमध्ये नियोजन विभाग, वित्त विभाग व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्यातील नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, कोकण, नांदेड अशा राज्यातील सर्व महसूल विभागांच्या आयुक्तांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर महसूल खात्याचे उपसचिव समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णय कोणत्या निकषांवर घेण्यात आला? अहमदनगरसह इतरही मोठ्या जिल्ह्यामधून विभाजनाची मागणी होत असताना त्यांचे विभाजन का केले जात नाही? असा प्रश्न अनेक मंत्र्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा विभाजनाबाबत सरकारने विचारात घेतलेल्या निकषांची माहिती देण्यात आली. जिल्हा विभाजन करणे ही अत्यंत क्लिष्ट व खर्चिक बाब असल्याने राज्यातील अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी राज्यस्तरावर कोणकोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत अभ्यास करुन सरकारला शिफारस करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी जिल्हा पुनर्रचना समिती गठीत करण्यात आली, असे आदेशात म्हटले आहे. २४ जून २०१४ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय क्रमांक प्राफेब २०१४/प्र. क्र. ८७/ठाणे/म-१० नुसार ही समिती गठीत केल्याचा आदेश काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)या समितीने जिल्ह्याचे विभाजन करताना विचारात घ्यावयाच्या निकषांबाबत आपल्या शिफारशी सरकारला सादर करायच्या आहेत. या शिफारशी सादर करण्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. -सोनलस्मित पाटील, अवर सचिव, महसूल विभाग