शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

जिल्हा विभाजनासाठी समितीची स्थापना

By admin | Updated: June 30, 2014 00:33 IST

श्रीरामपूर : राज्यातील अहमदनगर, बीड, नाशिकसह राज्यातील इतरही जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्हा निर्मितीची मागणी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

श्रीरामपूर : राज्यातील अहमदनगर, बीड, नाशिकसह राज्यातील इतरही जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्हा निर्मितीची मागणी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी पुनर्रचना समितीची स्थापना केली आहे. ही समिती दोन महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विभागाच्या अतिरक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्रचना समिती नेमली आहे. या समितीमध्ये नियोजन विभाग, वित्त विभाग व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्यातील नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, कोकण, नांदेड अशा राज्यातील सर्व महसूल विभागांच्या आयुक्तांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर महसूल खात्याचे उपसचिव समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णय कोणत्या निकषांवर घेण्यात आला? अहमदनगरसह इतरही मोठ्या जिल्ह्यामधून विभाजनाची मागणी होत असताना त्यांचे विभाजन का केले जात नाही? असा प्रश्न अनेक मंत्र्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा विभाजनाबाबत सरकारने विचारात घेतलेल्या निकषांची माहिती देण्यात आली. जिल्हा विभाजन करणे ही अत्यंत क्लिष्ट व खर्चिक बाब असल्याने राज्यातील अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी राज्यस्तरावर कोणकोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत अभ्यास करुन सरकारला शिफारस करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी जिल्हा पुनर्रचना समिती गठीत करण्यात आली, असे आदेशात म्हटले आहे. २४ जून २०१४ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय क्रमांक प्राफेब २०१४/प्र. क्र. ८७/ठाणे/म-१० नुसार ही समिती गठीत केल्याचा आदेश काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)या समितीने जिल्ह्याचे विभाजन करताना विचारात घ्यावयाच्या निकषांबाबत आपल्या शिफारशी सरकारला सादर करायच्या आहेत. या शिफारशी सादर करण्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. -सोनलस्मित पाटील, अवर सचिव, महसूल विभाग