शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 10, 2024 11:39 IST

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून, वारंवार मागणी करून देखील प्रशासनाला पाझर फुटत नाही़ त्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत़ नगरचे अर्थकारण उद्योगावर अवलंबून आहे़ बड्या उद्योगांवर ५०० छोटे उद्योग तग धरून आहेत़ काही मोठे उद्योगांचे बॉयलर थंडावले आहेत़ रोजगाराच्या संधीही जेमतेम आहेत़ उद्योगाला मरगळ आली आहे़ आधीच उद्योगासाठी पोषक वातावरण नाही़ त्यात पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ उद्योगांनाही विविध समस्यांनी घेरले आहे़ कंपनीत निर्माण होणारा कचरा रस्त्यावर पेटविला जातो़ कंपनीतील थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या,कागद, पॅकिंगचे साहित्य यासारख्या कचर्‍याचा ढीग रस्त्याच्या बाजूला साचला आहे़ किमान कंपनीतील टाकाऊ वस्तुंचे संकलन करणे,कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ही कामं करावीत,अशी उद्योजकांची अपेक्षा आहे़ मात्र कचर्‍याचे संकलन करणारी यंत्रणा उपलब्ध नाही़ कचरा संकलनाचे काम होत नाही़ उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल केला जातो़ परंतु त्याबदल्यात सुविधा पुरविल्या जात नाहीत़ पायाभूत सुविधासाठी उद्योजकांचा लढा अजूनही सुरूच असून,प्रशासनाला मात्र पाझर फुटत नाही़ उद्योजकांनी याविषयी निवेदने दिली़परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही़ त्यामुळे या समस्यात वाढच होत आहे़ लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्योजकांना लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली आहेत़ पण त्यावर कोणतीच कार्यवाही न झाली नाही़ त्यामुळे उद्योगाला कुणीच वाली नाही, अशी भावना उद्योजकांची झाली आहे़ (प्रतिनिधी) पथदिव्यांअभावी एमआयडीसीत अंधाराचे साम्राज्य बहुतांश कंपन्या चोवीस तास सुरू असतात़ रात्रीच्यावेळी कंपन्यांतील कामगारांची ये-जा सुरू असते़ रस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले आहेत़ परंतु पथदिव्यांची दुरवस्था झाली असून,ते बंद असतात़ त्यामुळे औद्योगिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असते़ याकडे प्रशासनाचे वेळोवळी उद्योजकांनी लक्ष वेधले़ परंतु याकडे प्रशासनाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले असून, प्रकाश व्यवस्था नसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़ कचरा रस्त्यावर कंपनीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो़ टाकाऊ वस्तू रस्त्यावर सर्रास टाकल्या जातात़ बहुतांश कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर कचर्‍यांचे ढीग पाहायला मिळताता. थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. हा कचरा जागेवरच कुजून दुर्गंधी सुटली आहे. कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने कचर्‍यांचे ढीग वाढतच आहेत. त्यामुळे एमआयडीसीची बकाल अवस्था झाली आहे. या दुर्गंधीने कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचर्‍याचे संकलन करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.