शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 10, 2024 11:39 IST

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून, वारंवार मागणी करून देखील प्रशासनाला पाझर फुटत नाही़ त्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत़ नगरचे अर्थकारण उद्योगावर अवलंबून आहे़ बड्या उद्योगांवर ५०० छोटे उद्योग तग धरून आहेत़ काही मोठे उद्योगांचे बॉयलर थंडावले आहेत़ रोजगाराच्या संधीही जेमतेम आहेत़ उद्योगाला मरगळ आली आहे़ आधीच उद्योगासाठी पोषक वातावरण नाही़ त्यात पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ उद्योगांनाही विविध समस्यांनी घेरले आहे़ कंपनीत निर्माण होणारा कचरा रस्त्यावर पेटविला जातो़ कंपनीतील थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या,कागद, पॅकिंगचे साहित्य यासारख्या कचर्‍याचा ढीग रस्त्याच्या बाजूला साचला आहे़ किमान कंपनीतील टाकाऊ वस्तुंचे संकलन करणे,कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ही कामं करावीत,अशी उद्योजकांची अपेक्षा आहे़ मात्र कचर्‍याचे संकलन करणारी यंत्रणा उपलब्ध नाही़ कचरा संकलनाचे काम होत नाही़ उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल केला जातो़ परंतु त्याबदल्यात सुविधा पुरविल्या जात नाहीत़ पायाभूत सुविधासाठी उद्योजकांचा लढा अजूनही सुरूच असून,प्रशासनाला मात्र पाझर फुटत नाही़ उद्योजकांनी याविषयी निवेदने दिली़परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही़ त्यामुळे या समस्यात वाढच होत आहे़ लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्योजकांना लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली आहेत़ पण त्यावर कोणतीच कार्यवाही न झाली नाही़ त्यामुळे उद्योगाला कुणीच वाली नाही, अशी भावना उद्योजकांची झाली आहे़ (प्रतिनिधी) पथदिव्यांअभावी एमआयडीसीत अंधाराचे साम्राज्य बहुतांश कंपन्या चोवीस तास सुरू असतात़ रात्रीच्यावेळी कंपन्यांतील कामगारांची ये-जा सुरू असते़ रस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले आहेत़ परंतु पथदिव्यांची दुरवस्था झाली असून,ते बंद असतात़ त्यामुळे औद्योगिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असते़ याकडे प्रशासनाचे वेळोवळी उद्योजकांनी लक्ष वेधले़ परंतु याकडे प्रशासनाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले असून, प्रकाश व्यवस्था नसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़ कचरा रस्त्यावर कंपनीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो़ टाकाऊ वस्तू रस्त्यावर सर्रास टाकल्या जातात़ बहुतांश कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर कचर्‍यांचे ढीग पाहायला मिळताता. थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. हा कचरा जागेवरच कुजून दुर्गंधी सुटली आहे. कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने कचर्‍यांचे ढीग वाढतच आहेत. त्यामुळे एमआयडीसीची बकाल अवस्था झाली आहे. या दुर्गंधीने कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचर्‍याचे संकलन करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.