शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 10, 2024 11:39 IST

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून, वारंवार मागणी करून देखील प्रशासनाला पाझर फुटत नाही़ त्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत़ नगरचे अर्थकारण उद्योगावर अवलंबून आहे़ बड्या उद्योगांवर ५०० छोटे उद्योग तग धरून आहेत़ काही मोठे उद्योगांचे बॉयलर थंडावले आहेत़ रोजगाराच्या संधीही जेमतेम आहेत़ उद्योगाला मरगळ आली आहे़ आधीच उद्योगासाठी पोषक वातावरण नाही़ त्यात पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ उद्योगांनाही विविध समस्यांनी घेरले आहे़ कंपनीत निर्माण होणारा कचरा रस्त्यावर पेटविला जातो़ कंपनीतील थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या,कागद, पॅकिंगचे साहित्य यासारख्या कचर्‍याचा ढीग रस्त्याच्या बाजूला साचला आहे़ किमान कंपनीतील टाकाऊ वस्तुंचे संकलन करणे,कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ही कामं करावीत,अशी उद्योजकांची अपेक्षा आहे़ मात्र कचर्‍याचे संकलन करणारी यंत्रणा उपलब्ध नाही़ कचरा संकलनाचे काम होत नाही़ उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल केला जातो़ परंतु त्याबदल्यात सुविधा पुरविल्या जात नाहीत़ पायाभूत सुविधासाठी उद्योजकांचा लढा अजूनही सुरूच असून,प्रशासनाला मात्र पाझर फुटत नाही़ उद्योजकांनी याविषयी निवेदने दिली़परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही़ त्यामुळे या समस्यात वाढच होत आहे़ लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्योजकांना लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली आहेत़ पण त्यावर कोणतीच कार्यवाही न झाली नाही़ त्यामुळे उद्योगाला कुणीच वाली नाही, अशी भावना उद्योजकांची झाली आहे़ (प्रतिनिधी) पथदिव्यांअभावी एमआयडीसीत अंधाराचे साम्राज्य बहुतांश कंपन्या चोवीस तास सुरू असतात़ रात्रीच्यावेळी कंपन्यांतील कामगारांची ये-जा सुरू असते़ रस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले आहेत़ परंतु पथदिव्यांची दुरवस्था झाली असून,ते बंद असतात़ त्यामुळे औद्योगिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असते़ याकडे प्रशासनाचे वेळोवळी उद्योजकांनी लक्ष वेधले़ परंतु याकडे प्रशासनाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले असून, प्रकाश व्यवस्था नसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़ कचरा रस्त्यावर कंपनीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो़ टाकाऊ वस्तू रस्त्यावर सर्रास टाकल्या जातात़ बहुतांश कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर कचर्‍यांचे ढीग पाहायला मिळताता. थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. हा कचरा जागेवरच कुजून दुर्गंधी सुटली आहे. कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने कचर्‍यांचे ढीग वाढतच आहेत. त्यामुळे एमआयडीसीची बकाल अवस्था झाली आहे. या दुर्गंधीने कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचर्‍याचे संकलन करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.