शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: May 27, 2014 00:32 IST

राहुरी (जि. अहमदनगर) : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य दोघांना मोठ्या शर्थीने वाचविण्यात यश आले.

राहुरी (जि. अहमदनगर) : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य दोघांना मोठ्या शर्थीने वाचविण्यात यश आले. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तांभेरे येथे ही घटना घडली. सोमनाथ गोरक्षनाथ लाटे ( १५) व राजेंद्र दशरथ लाटे (१६, रा, चिंचोली, ता़ राहुरी) अशी मृतांची नावे आहेत. चिंचोली येथून सहाजण ऊसतोडणीसाठी तांभेरे येथे आले होते़ दिवसभर उन्हात ऊसतोडणी करून थकल्याने व उन्हाची काहिली शमविण्यासाठी ते सर्वजण जवळच असलेल्या सखाहरी दगडू गागरे यांच्या शेततळयात पोहण्यासाठी गेले होते़ त्यातील चौघांना पोहता येत नव्हते. तब्बल २० फूट खोल असलेल्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने सोमनाथ व राजेंद्र दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. दरम्यान, संभाजी लाटे व निलेश काळे हे दोघेही पाण्यात उतरून कडेला आंघोळ करीत होते. सोमनाथ व राजेंद्र गटांगळ्या खाऊ लागल्याने संभाजी व निलेश गडबडून गेले व त्यांचा तोल जाऊन तेही खोल पाण्यात पडले. शेततळ्यातील प्लॅस्टिक कागद, गाळ व शेवाळ तयार झाल्याने त्यांना कशाचा आधार मिळत नव्हता. शिवाय पाय घसरत असल्याने वर येण्यास अडथळे येत होते. आता चौघांना वाचविण्याचे मोठे आव्हान त्यांचेच दोन साथीदार अमोल व विशाल आरगडे यांच्यासमोर होते. एकाच वेळी चौघे बुडाल्याने तेही भयभीत झाले. त्यांनी प्रयत्न करून दोघांना वाचवले. मृतांवर रात्री आठ वाजता चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हे.कॉ. आहेर करीत आहेत़ (तालुका प्रतिनिधी) थोड्याच वेळात घटनेची माहिती परिसरात पसरली. तसे लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. राहुरी पंचायत समितीचे उपसभापती दिगंबर शिरसाट, लक्ष्मण साबळे, संभाजी आडसुरे, अण्णासाहेब पारखे, राजेंद्र लाटे यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले़ चौघेही बुडत असताना अमोल व विशाल यांनी मोठ्या हिमतीने जवळच असलेली ठिबक सिंचनाची नळी बुडत असलेल्या युवकांकडे फेकली. त्याचा आधार घेत लाटे व काळे पाण्याबाहेर आले. परंतु तोपर्यंत सोमनाथ व राजेंद्र यांचा बुडून मृत्यू झाला होता.