शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

अवर्षण भागातील शेतीही फुलणार

By admin | Updated: June 23, 2014 00:07 IST

थोरात : निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम सुरू

अकोले : निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम पूर्णत्वाकडे जात असून कालवेही लवकरच पूर्ण होत अवर्षण भागातील शेतकऱ्यांची शेती फुलणार आहे. धरणासाठी पिचडांच्या खाद्याला खांदा लावून पुनर्वसनापासून ते निधी मिळवण्यासाठी सरकार दरबारी लढलो म्हणूनच निळवंडे निर्मितीचा आनंद घेता आला, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. निळवंडे धरणाच्या उंचावरील कालवा विमोचक बोगद्याच्या खोदाईचा शुभारंभ मंत्री थोरात, पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाला. यावेळी थोरात यांनी निळवंडेच्या कामात आलेल्या अडचणी संगमनेर, अकोल्याच्या मंत्रीद्वयींनी कशा दूर केल्या ते सांगितले. पालकमंत्री पिचड म्हणाले, उद्या थोरातांच्या रुपाने जिल्ह्यात मुख्यमंत्रीपद येणार असून त्यांना आपले व्यक्तिगत व पक्षाचे पाठबळ देऊन सहकार्य करू. निळवंडे निर्मितीत त्यांचा मोठा वाटा असून स्वर्गीय भाऊसाहेबांचे सतत मार्गदर्शन लाभले म्हणून चार कालवे असलेला हा पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. पाण्यापासून वंचित असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना उंचावरील कालव्यांमुळे हक्काचे पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाची तहान भागणार आहे. प्रवरा नदीपात्र वाळू उपशामुळे खोल गेले आहे. नदीची झिज भरुन येण्यासाठी ‘प्रोफाईल वॉल’ गरजेची असून पूर्वेकडून कितीही विरोध झाला तरी अकोले, संगमनेर तालुक्यात ‘प्रोफाईल वॉल’करणारच असे ना. पिचड यांनी स्पष्ट केले. निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे नेते यशवंत आभाळे यांनी प्रास्ताविक केले. शेतकरी शेतमजूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर नवले, जि. प. सदस्य परबत नाईकवाडी, मिनानाथ पांडे यांचीही भाषणे झाली. काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)