शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

गणेशोत्सवात घुमणार ढोल ताशा

By admin | Updated: August 24, 2014 23:08 IST

शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे़

अहमदनगर : मागील चार ते पाच वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे हा चांगलाच आकर्षणाचा विषय ठरत होता़ मात्र, ध्वनीप्रदूषण, प्रशासनाचा धाक आणि दरवाढ याला कंटाळून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे़ त्यामुळे यंदा दहा दिवसांच्या गणेशोत्सवात बहुतांश ठिकाणी डीजे ऐवजी ढोल-ताशा, डोलीबाजा, झांजपथक आणि सनई चौघड्यांचा आवाज घुमणार आहे़ शहरासह उपनगरातील वीस मंडळांच्यावतीने गणेश चतुर्थी, आरास उद्घाटन आणि अनंत चतुदर्शीला पारंपरिक वाद्य वाजविण्यात येणार आहेत़ शहरातील मानाच्या बारा गणेश मंडळांनी डीजे न वाजविण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले़ डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मोठे ध्वनीप्रदूषण होते़ त्यातच डीजेसाठी वाहन, लाईट व जनरेटरची व्यवस्था मंडळालाच करावी लागत असल्याने मोठा खर्च होतो तर ६५ डेसिबलपेक्षा पुढे डीजेचा आवाज गेला की, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई होते़ यापेक्षा अगदी कमी दरात पारंपरिक वाद्यपथक उपलब्ध होत आहे़ महाराष्ट्राची परंपरा वृध्दिंगत करणारे ढोल-ताशा, डोलीबाजा आणि झांजपथक भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत़ शहरातील पारंपरिक वाद्यपथकांना जिल्ह्यासह बाहेरूनही मागणी वाढली आहे़ (प्रतिनिधी)डोली बाजाला मागणीइतर इलेक्ट्रॉनिक वाद्याच्या तुलनेत डोली बाजाची अगदी कमी दरात सेवा पुरविण्यात येते़ कमी आवाज आणि कलात्मक पद्धतीने सादरीकरण करण्यात येते़ त्यामुळे मिरवणूक पाहाणाऱ्यांचे मनोरंजन होते़ यावर्षी बहुतांश गणेश मंडळांकडून डोली बाजाला मागणी वाढली आहे़- अमोल कणगरे, डोलीबाजा पथक संचालकभाविकांसाठी आकर्षणकोणत्याही मंगलमय उत्सवात ढोल-ताशा पथकाला सर्वांचीच पसंती असते़ यावर्षी खास नगरच्या गणेश मंडळांना सेवा पुरविण्यासाठी ढोल-पथकाची स्थापना करण्यात आली असून, ७० जणांचे ढोल-ताशा पथक भाविकांचे मनोरंजन करणारे ठरत आहे़ शहरातील अनेक गणेश मंडळांनी सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे़ - तन्मय घोडके, तालयोगी ढोलपथक, संचालक.