अहमदनगर : जिल्हा कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठीपदाच्या जागांसाठी रविवारी झालेल्या लेखी परीक्षेत ६ हजार ४९१ परीक्षार्थीनी दांडी मारली. नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी असणाऱ्या ६० केंद्रांवर १४ हजार ६६८ उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.परीक्षेसाठी ६० उपकेंद्रावर २१ हजार १५९ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली होती. यात नगरला दहा उपकेंद्रांवर १३ हजार २२४, संगमनेरातील १४ केंद्रांवर ४ हजार ६०८ आणि श्रीरामपूर येथील १० केंद्रांवर ३ हजार ३२७ उमेदवारांचा समावेश होता. परीक्षे दरम्यान, नगरला ३ हजार ५२०, संगमनेरला १ हजार ८११ आणि श्रीरामपूरला १ हजार १६० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेसाठी ७ उपजिल्हाधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून ६० वर्ग १ आणि २ चे अधिकाऱ्यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून, सहाय्यक ६०, पर्यवेक्षक आणि सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून प्रत्येकी २१०, ६० लिपीक, ६० शिपाई, ७० वाहन चालक आणि २१० पाणी वाटप कर्मचारी यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
साडे सहा हजार परीक्षार्थींची दांडी
By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST