शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कुकडीच्या पाण्यात नगरकर उपाशी!

By admin | Updated: June 30, 2014 00:33 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील सर्व धरणातील पाणी साठा जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील सर्व धरणातील पाणी साठा जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र पुणे जिल्ह्यासाठी डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यातून अखंडपणे आवर्तन चालू आहे. मात्र नगर जिल्ह्याचा कालवा मात्र कोरडा ठेवण्यात आला आहे. पाणी वाटपात पुणेकर तुपाशी तर नगर जिल्हा मात्र उपाशी आहे. कुकडी प्रकल्पातील नगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २५० गावांमध्ये अस्मानी जलसंकट उभे राहिले आहे. श्रीगोंदा, करमाळा, कर्जत, पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कुकडीच्या आवर्तनाची मागणी केली. विरोधकांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा झटका दाखविला. श्रीगोंद्यात पिण्याच्या आवर्तनासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली. कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडण्याबाबत दि.१ जुलै रोजी मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. पिण्यासाठी पाणी राखीव असताना डिंबे उजवा कालवा कुणाच्या आदेशावरून सोडण्यात आला. येडगाव कालव्यातून पाणी सोडण्यासाठी बैठक कशासाठी यावर आ. बबनराव पाचपुते, आ. विजय औटी, आ. प्रा.राम शिंदे, आ. शामल बागल यांनी प्रहार करण्याची गरज आहे. कुकडी पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी डिंबे-माणिकडोह बोगदा तातडीने करणे गरजेचे आहे तरच नगरकरांना अच्छे दिन येतील अन्यथा शेतीचे वाळवंट होणार हे निश्चित आहे. (तालुका प्रतिनिधी)

कुकडीचे जलसंकट...

गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पातील धरणामध्ये ३१.५ टीएमसी (१०० टक्के) उपयुक्त पाणी साठा आला. मात्र पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून सुमारे ५-६ टीएमसी पाण्यावर डल्ला मारला. त्यामुळे नगर, सोलापूर जिल्ह्यावर एका आवर्तनाचा अन्याय झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री चौकशी करणार का? नगरकर तहान भागविण्यासाठी पिण्याचे आवर्तनासाठी व्याकूळ झाले आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात डिंबेचा उजवा कालवा व घोड नदीत सुमारे २५० क्युसेकने पाणी कसे सोडले यावर मुख्यमंत्री चौकशी करणार का? हाच खरा सवाल आहे. मलमपट्टी आणि आॅपरेशन कुकडीच्या पाण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी उन्हाळ्यात टाहो फोडतात. लोकप्रतिनिधी बैठकाच्या तारखा सांगतात तर विरोधक आंदोलन पेटवितात. आवर्तनावर मलमपट्टी केली जाते. मात्र पाणी प्रश्नाचा आजार तसाच ठेवला जातो. कुकडीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. आम्ही दोन दिवसापूर्वी डिंबे धरणावर गेलो असता डिंबेचा उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर घोड नदीत १०० क्युसेसने पाणी सोडले होते हे डोळ्यांनी पाहिले. यामुळे मनात दु:खाचे काहूर निर्माण झाले. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिण्यास पाणी नाही. मात्र पुणे जिल्ह्याला शेतीस पाणी हा कुठला न्याय! शेतकऱ्यांनी आघाडी सरकारमधील मंत्री, आमदारांना जाब विचारण्याची गरज आहे. अन्यथा नगर जिल्ह्यातील शेतीचे वाळवंट झाले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे दुर्दैवी सत्र चालू होईल, याला जबाबदार कोण? -राजेंद्र म्हस्के अध्यक्ष, कुकडी घोड पाटपाणी, कृती समिती