शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

नगर शहराची पाणी कपात टळली

By admin | Updated: May 2, 2016 23:29 IST

अहमदनगर : मुळा धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने नगर शहरावर पाणी कपातीचे संकट घोंगावत होते. फेज टू पाणी योजनेचा पहिला टप्पा सोमवारी (दि.२) पूर्ण झाला.

महापालिका : ४०० हॉर्स पॉवरचे पंप सुरूअहमदनगर : मुळा धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने नगर शहरावर पाणी कपातीचे संकट घोंगावत होते. फेज टू पाणी योजनेचा पहिला टप्पा सोमवारी (दि.२) पूर्ण झाला. पाणी उपसा करणारे चारशे हॉर्स पॉवरचे दोन पंप कार्यान्वीत झाल्याने शहराच्या पाणी कपातीचे संकट टळले आहे. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते बटन दाबून या मोटारी सुरू करण्यात आल्या. नगर शहराला दररोज ७० दशलक्ष लीटर पाणी लागते. मुळा धरणात ५६० हॉर्स पॉवरच्या तीन तर दोनशे हॉर्स पॉवरच्या तीन अशा सहा मोटारी रात्रंदिवस सुरू आहेत. धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने पाणी उपशावर त्याचा परिणाम जाणवत होता. त्यामुळे काही दिवसांनी शहराच्या पाणी कपातीशिवाय महापालिकेकडे दुसरा पर्यायच नव्हता. फेज टू पाणी योजनेंतर्गत दोनशे हॉर्स पॉवरच्या मोटारी काढून त्या ऐवजी चारशे हॉर्स पॉवरच्या मोटारी टाकण्यात आल्या. महावितरण कंपनीने शनिवारी त्यासाठी अतिरिक्त वीज पुरवठा केला. सोमवारी आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते बटन दाबून या मोटारीचा पाणी उपसा सुरू झाला. सभापती गणेश भोसले, सभागृह नेते कुमार वाकळे, नगरसेवक अनिल बोरुडे, आयुक्त विलास ढगे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम, ठेकेदार कंपनीचे संचालक किशोर आग्रवाल यावेळी उपस्थित होते. उन्हाळ्यात धरणातील पाणी पातळी खालावत चालल्याने मुळा धरणातून पाणी उपसा करण्याकरीता सहा पंप रात्रंदिवस चालवावे लागत होते. धरणातील पाणी पातळी १७५२ फुटाच्या खाली गेल्यानंतर हे पंप बंद पडायचे. आता नव्याने चारशे हॉर्स पॉवरचे पंप सुरू झाल्याने धरणातील पाणी पातळी १७५२ फुटाच्या खाली गेली तरी पाणी उपसा सुरू राहणार आहे. शिवाय ५६० हॉर्स पॉवरचे पंप बदलून त्याऐवजी सातशे हॉर्स पॉवरचे पंप टाकले जाणार आहेत. मात्र पाणी उपसा सुरू असतानाच हे काम करणे जिकरीचे असल्याने त्याला विलंब लागतो. चारशे हॉर्स पॉवरचे पंप टाकतानाही पाणी पुरवठा विभागाला मोठे कष्ट घ्यावे लागले. पूर्वीच्या पंपातून पाणी उपसा कमी होत असल्याने पाणी कपातीचे संकट शहरावर घोंगावत होते. आता चारशे हॉर्स पॉवरचे पंप सुरू झाल्याने हे संकट टळले आहे. (प्रतिनिधी)पाणी पुनर्वापर प्रकल्पही कार्यान्वितधरणातून पाणी उपसा केल्यानंतर ते विळद जल शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे शुद्धीकरण करताना जवळपास पाच लाख लीटर पाणी वाया जाते. ते पाणी पुन्हा वापरात आणण्याकरीता दहा लाख रुपये खर्च करून पुनर्वापर प्रकल्प उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरणानंतर कोणतेच पाणी यापुढे वाया जाणार नाही. हा प्रकल्प पुढील आठवड्यात कार्यान्वीत केला जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. धरणात १५ जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. नव्याने चारशे हॉर्स पॉवरच्या मोटारी बसविल्या गेल्याने पाणी पातळी खाली गेली तरी पाणी उपसा सुरू राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी खालावली तरी शहराच्या पाणी उपशावर कोणताच परिणाम होणार नाही. मुळा धरणात चारशे हॉर्स पॉवरच्या मोटारी सुरू झाल्याने विळद जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत ७० दशलक्ष लीटर पाणी धरणातील पाणी पातळी खालावली असतानाही येणार आहे. तेथून ते पाणी वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीत पोहोचले. त्यामुळे नगर शहराला उन्हाळ्यातही पुरेसे पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात यामुळे होणार नाही. - संग्राम जगताप, आमदारफेज टू पाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान आहे. शहराला आता पुरेसे पाणी मिळणार आहे. दोन मोटारी बदलल्या आहेत. आणखी चार मोटारी बदलणे बाकी आहे. ते काम पूर्ण झाले की शहराला भरपूर पाणी मिळेल. धरणातील पाणी पातळी खालावली तरी शहराला आता पुरेसे पाणी मिळेल.- अभिषेक कळमकर, महापौर.