शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आघाडीतील बिघाडी, युतीत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:50 IST

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे़ काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांच्याच नात्यातील

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे़ काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांच्याच नात्यातील संग्राम कोते यांना राष्ट्रवादीने निवडणूक मैदानात उतरविले आहे़ त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली़ सोधा पक्षातीतील फाटाफूट आपल्याच पथ्यावर पडणार, या अविर्भावात जिल्ह्यातील भाजपा आहे़ पण, मित्र पक्ष सेनेने भूमिका स्पष्ट न केल्याने युतीतही संशयकल्लोळ असल्याचे चित्र सध्यातरी आहे़ नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे़ मात्र विधान परिषदेच्या इतर मतदारसंघात दोन्ही काँग्रेसने एकमेकांविरोधात दंड थोपटले़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले, याचाच अर्थ नाशिक पदवीधरमध्ये आघाडी होणार नाही, असे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी घाईघाईने कोते यांची उमेदवारी जाहीर केली़शिर्डी येथील रहिवासी कोते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व सुधीर तांबे यांचे सोयरे आहेत, तसे कोते यांनीच जाहीर केले आहे़ त्यात काँग्रेसमध्ये विखे व थोरात, असे दोन गट आहेत, ते सर्वश्रुत आहे़ दोन्ही गटांची मनधरणी करत तांबे यांनी निवडणुकीची तयारी केली़ पण, ऐनवेळी कोते मैदानात उतरले आहेत़ राष्ट्रवादीचे माजीमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घातले असून, जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत़ जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने व शैक्षणिक संस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आहेत़ साखर कारखान्यातील कामगारांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसची ही जमेची बाजू आहे़ परंतु निवडणुकीसाठी त्याचा किती वापर होतो, हा संशोधनाचा विषय आहे़ परंतु दोन्ही काँग्रेसमधील भांडण, आपल्या पथ्यावर पडणार, म्हणून भाजपात कमालीचा उत्साह संचारला आहे़पण, तो कितीकाळ टिकेल, याचा भरवसा नाही़ आघाडीतील बिघाडीप्रमाणेच युती बेभरवशाचीच आहे़ भाजपाने प्रशांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली़ उमेदवारी जाहीर झाली, तेव्हापासून कार्यकर्ते कामाला लागले़ पण, सेना अलिप्तच आहे़ कारण मातोश्रीचा आदेश येणे बाकी आहे़ तो आल्यानंतर काय ते ठरवू, अशी जिल्ह्यातील सेनेची धारणा आहे़ त्यामुळे आघाडीत बिघाडी आणि युतीत संशयकल्लोळ, असे चित्र सध्या तरी आहे़ (प्रतिनिधी)मतदार नोंदणीचा शनिवार अखेरचा दिवस आहे़ ऐनवेळी राष्ट्रवादीने निवडणुकीत उडी घेत मतदार वाढविण्यावर भर दिला आहे़ यापूर्वीच शिक्षण संस्था व कारखान्यांमार्फत पदवीधरांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुरू केली होती़ परंतु, काहींनी लाभ ना नफा, असे म्हणत याकडे कानाडोळा केला होता़ मात्र आता पक्षश्रेष्ठींनीच आदेश दिल्याने शिक्षण संस्था व कारखान्यात मतदार नोंदणीची लगीनघाई सुरू आहे़ ऐनवेळी किती मतदार नोंदणी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात मोठी पीछेहाट झाली़ त्यामुळे आगामी निवडणुकांत आपआपले गड शाबूत ठेवण्यातच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सर्वाधिक वेळ आणि ताकद खर्ची पडत आहे़ त्यात नगरपालिकांच्या निवडणुकाही आहेतच़ त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीलाही राष्ट्रवादी काँगे्रसला सामोरे जायचे आहे़ बहुतांश नेते आपल्याच मतदारसंघाची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत़ त्यात आता पदवीधरचीही जबाबदारी येऊन पडली आहे़ विशेष करून शिक्षण व साखर सम्राटांवरच राष्ट्रवादीची भिस्त आहे़ पदवीधरच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे़