शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

१५ आॅक्टोबरला धडाडणार बॉयलर

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

येत्या १५ आॅक्टोबरपासून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहे.

अहमदनगर : एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा म्हणून उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २५ टक्के ऊस संपला असून त्याचा परिणाम गाळपावर होणार आहे. दरम्यान, येत्या १५ आॅक्टोबरपासून कारखान्याचे बॉयलर पेटणार असून ३० आॅक्टोबरपर्यंत गाळपाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली असली तरी त्याचा फारसा परिणाम गाळपावर होणार नाही. यंदा पाऊस चांगला झाल्यास पुढील वर्षी उसाचे क्षेत्र वाढणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून ७९ लाख ३० हजार मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आलेला आहे. गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. त्यावेळी खरिपाच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न नव्हता, तसेच नवीन लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती. यंदा परिस्थिती विपरीत आहे. साधारण जानेवारी ते मार्च या काळात झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेली पाण्याच्या टंचाईचा फटका शेतात उभ्या असणाऱ्या उसाला बसला आहे. ऐन पावसाळ्यात यंदा जनावरांना चाऱ्यासाठी उसाचा वापर करण्याची वेळ आली. यामुळे उपलब्ध उसापैकी सुमारे २५ टक्के ऊस संपला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. सर्व उसाचे गाळप झाल्यास त्यातून ७९ लाख ३० हजार मेट्रीक टन गाळप होईल असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात चाऱ्याची भीषण टंचाई आहे. आता पावसाला सुरुवात झाली असली तरी चारा उपलब्ध होण्यास सुमारे महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. (प्रतिनिधी)नगर विभागात असणाऱ्या साखर कारखान्यांकडे किती ऊस शिल्लक आहे. त्यांना गाळपासाठी किती उसाची आवश्यकता आहे, याची माहिती त्यांना येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. यामुळे येत्या ३० तारखेला जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे गळिताचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या गाळपाची माहिती सादर करावी लागणार आहे.मच्छिंद्र कुसमुडे,कृषी अधिकारी, प्रादेशिक सहसंचालक साखर. परवानगी आवश्यक३१ जुलैला मंत्री समितीच्या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार १५ आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी देण्यात आलेली आहे. प्रत्येक कारखाना व्यवस्थापनाला यासाठी साखर आयुक्तांची परवानगी आवश्यक करण्यात आलेली आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत ही परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून परवानगी न घेता गाळप करणाऱ्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.