शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड

By admin | Updated: June 4, 2024 17:54 IST

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला सापळा रचून पकडले.

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. सचिन रघुनाथ शिंदे यांनी रहिमपूर हद्दीतील प्रवरा नदीपात्रामधील घेतलेल्या वाळू उपसा लिलावाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. परंतु भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अचानक झालेल्या पावसाने प्रवरेला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे सुरू असलेला वाळूचा उपसा थांबवावा लागला. दरम्यान लिलावाप्रमाणे संपूर्ण वाळू काढता न आल्याची बाब शिंदे यांनी तलाठी गडदे याच्या निदर्शनास आणून दिली. तसेच रितसर पंचनामा करून उर्वरित वाळू पाणी ओसरल्यावर काढणार असल्याचे सांगितले. परंतु तसे करण्यासाठी गडदे याने शिंदे यांच्याकडे १० हजाराची मागणी केली. दरम्यान शिंदे यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपतचे निरीक्षक विजय मुर्तडक, चंद्रशेखर सावंत, हेड कॉन्स्टेबल वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, नितीन दराडे, प्रमोद जरे, सुनील पवार, राजेंद्र सावंत, एकनाथ आव्हाड, श्रीपाद ठाकूर व पथकाने पंचायत समितीनजीक सापळा लावला. शिंदे यांच्याकडून १० हजाराची लाच घेताना पथकाने गडदे यास रंगेहाथ पकडले. मतदार नोंदणीसाठी आज अखेरचा दिवसअहमदनगर: विधानसभा निवडणूक मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस आहे़ अखेरच्या दिवशी जिल्हाभर मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे़ नागरिकांनी या मोहिमेंतर्गत नाव नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले आहे़मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असते़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख ४ हजार ३५३ झाली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे़ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते़ त्यानुसार नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटची संधी असून, मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे़ दि़ १ जानेवारी २०१४ रोजी वय १८ वर्षे झाले आहे़ परंतु अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी म्हणून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़श्रीरामपूर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात ही मोहीम राबविली जाणार आहे़ मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी केली जाणार आहे़ नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदार नोंदणी करावी़ संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील़ नागरिकांनी क्रमांक- ६ चा अर्ज घेऊन नाव नोंदणी करावी़ विधानसभा निवडणुकीत ज्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांनी विशेष मोहिमेंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन कवडे यांनी केले आहे़