शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड

By admin | Updated: June 4, 2024 17:54 IST

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला सापळा रचून पकडले.

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. सचिन रघुनाथ शिंदे यांनी रहिमपूर हद्दीतील प्रवरा नदीपात्रामधील घेतलेल्या वाळू उपसा लिलावाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. परंतु भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अचानक झालेल्या पावसाने प्रवरेला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे सुरू असलेला वाळूचा उपसा थांबवावा लागला. दरम्यान लिलावाप्रमाणे संपूर्ण वाळू काढता न आल्याची बाब शिंदे यांनी तलाठी गडदे याच्या निदर्शनास आणून दिली. तसेच रितसर पंचनामा करून उर्वरित वाळू पाणी ओसरल्यावर काढणार असल्याचे सांगितले. परंतु तसे करण्यासाठी गडदे याने शिंदे यांच्याकडे १० हजाराची मागणी केली. दरम्यान शिंदे यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपतचे निरीक्षक विजय मुर्तडक, चंद्रशेखर सावंत, हेड कॉन्स्टेबल वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, नितीन दराडे, प्रमोद जरे, सुनील पवार, राजेंद्र सावंत, एकनाथ आव्हाड, श्रीपाद ठाकूर व पथकाने पंचायत समितीनजीक सापळा लावला. शिंदे यांच्याकडून १० हजाराची लाच घेताना पथकाने गडदे यास रंगेहाथ पकडले. मतदार नोंदणीसाठी आज अखेरचा दिवसअहमदनगर: विधानसभा निवडणूक मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस आहे़ अखेरच्या दिवशी जिल्हाभर मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे़ नागरिकांनी या मोहिमेंतर्गत नाव नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले आहे़मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असते़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख ४ हजार ३५३ झाली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे़ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते़ त्यानुसार नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटची संधी असून, मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे़ दि़ १ जानेवारी २०१४ रोजी वय १८ वर्षे झाले आहे़ परंतु अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी म्हणून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़श्रीरामपूर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात ही मोहीम राबविली जाणार आहे़ मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी केली जाणार आहे़ नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदार नोंदणी करावी़ संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील़ नागरिकांनी क्रमांक- ६ चा अर्ज घेऊन नाव नोंदणी करावी़ विधानसभा निवडणुकीत ज्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांनी विशेष मोहिमेंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन कवडे यांनी केले आहे़