शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड

By admin | Updated: June 4, 2024 17:54 IST

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला सापळा रचून पकडले.

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. सचिन रघुनाथ शिंदे यांनी रहिमपूर हद्दीतील प्रवरा नदीपात्रामधील घेतलेल्या वाळू उपसा लिलावाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. परंतु भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अचानक झालेल्या पावसाने प्रवरेला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे सुरू असलेला वाळूचा उपसा थांबवावा लागला. दरम्यान लिलावाप्रमाणे संपूर्ण वाळू काढता न आल्याची बाब शिंदे यांनी तलाठी गडदे याच्या निदर्शनास आणून दिली. तसेच रितसर पंचनामा करून उर्वरित वाळू पाणी ओसरल्यावर काढणार असल्याचे सांगितले. परंतु तसे करण्यासाठी गडदे याने शिंदे यांच्याकडे १० हजाराची मागणी केली. दरम्यान शिंदे यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपतचे निरीक्षक विजय मुर्तडक, चंद्रशेखर सावंत, हेड कॉन्स्टेबल वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, नितीन दराडे, प्रमोद जरे, सुनील पवार, राजेंद्र सावंत, एकनाथ आव्हाड, श्रीपाद ठाकूर व पथकाने पंचायत समितीनजीक सापळा लावला. शिंदे यांच्याकडून १० हजाराची लाच घेताना पथकाने गडदे यास रंगेहाथ पकडले. मतदार नोंदणीसाठी आज अखेरचा दिवसअहमदनगर: विधानसभा निवडणूक मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस आहे़ अखेरच्या दिवशी जिल्हाभर मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे़ नागरिकांनी या मोहिमेंतर्गत नाव नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले आहे़मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असते़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख ४ हजार ३५३ झाली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे़ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते़ त्यानुसार नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटची संधी असून, मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे़ दि़ १ जानेवारी २०१४ रोजी वय १८ वर्षे झाले आहे़ परंतु अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी म्हणून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़श्रीरामपूर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात ही मोहीम राबविली जाणार आहे़ मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी केली जाणार आहे़ नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदार नोंदणी करावी़ संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील़ नागरिकांनी क्रमांक- ६ चा अर्ज घेऊन नाव नोंदणी करावी़ विधानसभा निवडणुकीत ज्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांनी विशेष मोहिमेंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन कवडे यांनी केले आहे़