शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

... अन् भारताच्या खडबडीत रस्त्यांवर धावल्या नगरच्या लुना

By admin | Updated: May 16, 2016 00:08 IST

अहमदनगर : परदेशी कंपनीचा कुठलाही पार्ट व मशीन वापरायचे नाही. ही ‘लुना’नगरलाच बनवायची. तिचे वजन पन्नास किलो तर किंमतही दोन हजाराच्या आत हवी, अशा विविध अटी वडिलांनी आपणाला टाकल्या होत्या.

अहमदनगर : परदेशी कंपनीचा कुठलाही पार्ट व मशीन वापरायचे नाही. ही ‘लुना’नगरलाच बनवायची. तिचे वजन पन्नास किलो तर किंमतही दोन हजाराच्या आत हवी, अशा विविध अटी वडिलांनी आपणाला टाकल्या होत्या. अवघे पंधरा लाखांचे भांडवल त्यासाठी दिले होते. हे सगळे आव्हान आपण स्वीकारले व ‘लुना’ बनवली. नगरची व कायनेटिकची हीच लुना भारताच्या खडबडीत रस्त्यांवरुन सुसाट धावली, अशा ‘लुना’च्या आठवणी कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया यांनी ‘लोकमत’च्या समारंभात उलगडल्या. ‘लोकमत बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या समारंभात फिरोदिया बोलत होते. ते म्हणाले, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादन केले तर आपण उद्योगात यशस्वी होऊ शकतो. यासाठी त्यांनी ‘लुना’चे उदाहरण दिले. मी अमेरिकेत एका कंपनीत नोकरी करत असताना वडिलांच्या सल्ल्यानुसार भारतात आलो़ वडिलांच्या सूचनेनुसार नगरला लुनाचे उत्पादन सुरु केले. नवीन वाहन बाजारात आणत असताना ते कसे असावे, हे समजून घेणे गरजेचे होते़ त्यासाठी ठिकठिकाणी दुचाकीचे मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्यांचे सल्ले घेतले़ एकाने सांगितले, अनेकजण इंधनात रॉकेल वापरतात. त्यामुळे इंजिनमध्ये मोठा कार्बन जमा होऊन वाहन मेंटेनन्स वाढतो. त्यामुळे लुनाचे इंजिन उलटे बसवा. त्यामुळे लुनात तसा बदल केला. एक ग्राहक म्हणाला, खडबडीत रस्त्यांमुळे दुचाकी सतत पंक्चर होते. त्यामुळे चाक न खोलता लुनाचा पंक्चर काढता यायला हवा. तसाही बदल केला. दुचाकीचे इंजिन खोलल्यानंतर सर्वच वस्तुंचा मेंटेनन्स निघतो. त्यामुळे ‘लुना’चा गिअरबॉक्स, क्लच व मशीन वेगळे ठेवण्याचा सल्ला एका फिटरने दिला. हाही बदल आम्ही स्वीकारला. ग्राहक मागणी करतील तसे प्रयोग मी करत गेलो. त्याच जोरावर पन्नास लाख लुना विकल्या. इटलीमधील एका कंपनीत गेलो तेव्हा तेथील ‘आर अ‍ॅण्ड डी’ विभागात मला लुना दिसली. आमची लुना येथे कशी? म्हणून मी आश्चर्यचकित झालो. बाजारात दरवर्षी नव्याने येणारी लुना आम्ही येथे घेऊन येतो व त्यावर संशोधन करतो़, असे त्या कंपनीचे म्हणणे होते. भारतातील रस्ते अतिशय खडबडीत आहेत़, पेट्रोलमध्ये भेसळ आहे, तरीही या रस्त्यावर तुमची लुना व्यवस्थित चालते़, वजन ओढते आणि मेंटेनन्स काढत नाही, याचे त्या कंपनीला नवल वाटत होते. सदानंद जोशींमुळे अमेरिका समृद्ध महाराष्ट्रीयन माणूस उद्योगात पहिल्यापासून अग्रेसर आहे़ त्यांचा इतिहास मात्र, आपल्यापर्यंत पोहोचला नसल्याची खंत फिरोदिया यांनी व्यक्त केली़ ते म्हणाले, राईट बंधुंनी पहिले विमान उडविल्याचे सांगितले जाते़ प्रत्यक्षात मात्र, मुंबई येथे शिवरत्न बापूजी तळपदे या महाराष्ट्रातील व्यक्तीने पहिले विमान उडविले.भारतात इंग्रजांनी पहिल्यांदा रेल्वे आणली, असे सांगितले जाते़ इंग्रजांच्या आधी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी मुंबईत रेल्वे आणली आणि ती सुरू केली़ इंग्रजांनी याला प्रथम विरोध केला़ मात्र, रेल्वेचा उपयोग पाहून त्यांनी भारतात रेल्वेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला़ जगात कॅमेऱ्याचा शोध लागल्यानंतर चार वर्षांतच मुंबईच्या धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके यांनी भारतात प्रथम चित्रपट निर्मिती केली़ मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलच्या इमारतीचे डिझाईन महाराष्ट्रातील सखाराम वैद्य याने केलेले आहे़ सदानंद जोशी या महाराष्ट्रातील युवकाने अमेरिकेत नोकरी करत असताना तेथील वाळवंटातून कशी तेल निर्मिती करता येईल, याचा शोध लावला़ एकेकाळी आखाती देशातून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारी अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली़ या नव्या शोधामुळे जगात तेलाचे दर झपाट्याने कमी झाले़ हे महाराष्ट्राच्या सदानंदचे योगदान असल्याचे फिरोदिया यांनी यावेळी सांगितले़