शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

दूषित पाणीप्रकरणी कृतीपूर्ण कार्यक्रम

By admin | Updated: May 13, 2014 01:18 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागात दर महिन्यांला पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळत आहेत. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागात दर महिन्यांला पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळत आहेत. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली आहे. पाण्याचे पाणी दूषित होऊ नयेत, यासाठी कृतीपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पाणी नुमने दूषित आढळणार्‍यां गावात कार्यवाहीसाठी सहा पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. दोन तालुक्यासाठी एक पथक कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यात काही महिन्यांपासून अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे पाणी नमुने दूषित आढळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचात आणि आरोग्य विभागावर सोपविण्यात आलेली आहे. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन मार्फत पिण्याची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या निष्काळीपणामुळे दूषित पाणी नमुने आढळणार्‍या गांवाची संख्या वाढत आहे. यामुळे सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रमुख यांची बैठक घेतली. यात कृतीपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हास्तरावर सहा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात चार कर्मचारी यांच्या समावेश राहणार असून त्यात दोन आरोग्य विभागातील तर दोन पाणी पुरवठा मिशन कर्मचार्‍यांचा समावेश राहणार आहे. ज्या गावातील पाणी नमुने दूषित येईल, त्या ठिकाणी पथक जावून पाणी दूषित होण्याची कारणे आणि त्या ठिकाणी करण्यात येणार्‍या उपाययोजना पूर्ण करून त्या ठिकाणाहून परत येणार आहे. अशा पध्दतीने हे पथक ठरवून दिलेल्या तालुक्यातील दररोज चार गावांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी दिली. (प्रतिनिधी) जिल्ह्यात आरोग्य केंद्राची आणि संस्थांच्या स्वच्छतेबाबत वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार आरोग्य केंद्र आणि संस्थांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ही स्वच्छता आणि निगा न राखणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदर्श आरोग्य संस्था अस्तित्वात आणण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची संकल्पना असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डा. संदीप सांगळे यांनी दिली.