शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

दूषित पाणीप्रकरणी कृतीपूर्ण कार्यक्रम

By admin | Updated: May 13, 2014 01:18 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागात दर महिन्यांला पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळत आहेत. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागात दर महिन्यांला पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळत आहेत. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली आहे. पाण्याचे पाणी दूषित होऊ नयेत, यासाठी कृतीपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पाणी नुमने दूषित आढळणार्‍यां गावात कार्यवाहीसाठी सहा पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. दोन तालुक्यासाठी एक पथक कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यात काही महिन्यांपासून अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे पाणी नमुने दूषित आढळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचात आणि आरोग्य विभागावर सोपविण्यात आलेली आहे. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन मार्फत पिण्याची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या निष्काळीपणामुळे दूषित पाणी नमुने आढळणार्‍या गांवाची संख्या वाढत आहे. यामुळे सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रमुख यांची बैठक घेतली. यात कृतीपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हास्तरावर सहा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात चार कर्मचारी यांच्या समावेश राहणार असून त्यात दोन आरोग्य विभागातील तर दोन पाणी पुरवठा मिशन कर्मचार्‍यांचा समावेश राहणार आहे. ज्या गावातील पाणी नमुने दूषित येईल, त्या ठिकाणी पथक जावून पाणी दूषित होण्याची कारणे आणि त्या ठिकाणी करण्यात येणार्‍या उपाययोजना पूर्ण करून त्या ठिकाणाहून परत येणार आहे. अशा पध्दतीने हे पथक ठरवून दिलेल्या तालुक्यातील दररोज चार गावांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी दिली. (प्रतिनिधी) जिल्ह्यात आरोग्य केंद्राची आणि संस्थांच्या स्वच्छतेबाबत वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार आरोग्य केंद्र आणि संस्थांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ही स्वच्छता आणि निगा न राखणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदर्श आरोग्य संस्था अस्तित्वात आणण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची संकल्पना असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डा. संदीप सांगळे यांनी दिली.