शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

चौकशी अहवालानंतर टँकर घोटाळ्यातील दोषींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

श्रीगोंदा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या काळात झालेल्या टँकर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल येताच दोषींच्या विरोधात कारवाई ...

श्रीगोंदा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या काळात झालेल्या टँकर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल येताच दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

बुधवारी मुश्रीफ यांनी श्रीगोंदा येथे कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्ह्यातील टँकर घोटाळ्यांबाबत ‘लोकमत’ने अनेकदा पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. संबंधितांवर कारवाई करावी यासाठी अनेकांनी मागणीही केली आहे. त्यानुसार शासनाने ३० सप्टेंबरला चौकशी समितीही गठित केली आहे. मात्र, या समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. त्यानुसार चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई होईल. याशिवाय जिल्ह्यातील शेततळ्यांच्या घोटाळ्याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वाळूतस्करीबाबत तालुकास्तरावरून माहिती मागवत असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनामुळे १४५ जणांचा मृत्यू झाल्याचे आढावा बैठकीत प्रशासनाने जाहीर केले. त्यावर उपस्थित काही कार्यकर्त्यांनी तालुक्यातील कोराेनाच्या मृत्यू आकडेवारीवर आक्षेप घेतला. त्यावेळी मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशा सूचना केल्या. बबनराव पाचपुते म्हणाले, आढावा घेण्यास उशीर झाला. अधिकाऱ्यांनी कोरोनात उत्तम काम केले आहे. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. कोरोना मृत्यू आकडेवारीच्या संशयाबाबत चौकशी करावी.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्याचा तर प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी तालुक्याची कोरोना स्थिती सांगितली. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनोहर पोटे, अण्णासाहेब शेलार, शंकर पाडळे, तहसीलदार प्रदीप पवार, प्रशांत दरेकर, स्मितल वाबळे, राजेंद्र म्हस्के, दीपक भोसले, प्रशांत गोरे आदी उपस्थित होते.

---

कुकडीचे नियोजन गरजेचे..

घनश्याम शेलार म्हणाले, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. श्रीगोंद्यातील कोविड सेंटर चालकांचा सत्कार करण्यासाठी वेळ द्यावा. तसेच कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न गंभीर आहे. या आवर्तनात सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.