शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

२१ कृषी केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:08 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १६ कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर ५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने गुणनियंत्रण योजनेत बियाणे, कीटकनाशके यांच्या दर्जा आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठी जिल्हास्तरावर १, तालुकास्तरावर १३ अशी १४ भरारी पथके आहे. ही पथके बियाणे, खते, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्याचे काम पार पडते. भरारी पथकात १ पूर्ण वेळ आणि ४१ अर्धवेळ निरीक्षक कृषी सेवा तपासणीची मोहीम पार पाडत आहे. जिल्ह्यातील भरारी पथकाने केलेल्या पाहणीत पाथर्डी तालुक्यातील ४ व राहाता तालुक्यातील १ अशा ५ ठिकाणी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री होत असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी संबंधित कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे परवाना असताना दुकाने कायमस्वरूपी बंद असल्याचे आढळून आलेले संगमनेर १, नेवासा १, श्रीरामपूर १, नेवासा १, श्रीरामपूर १ आणि शेवगाव २ अशा ६ कृषिसेवा केंद्राचे खते, बियाणे, कीटकनाशके यांचे परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी दिली.एमआरपीपेक्षा अधिक दराने खते, बियाणे यांची विक्री होत असल्यास कृषी विभाग आणि पंचायत समिती विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन नलगे यांनी केले आहे.