शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

२१ कृषी केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:08 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १६ कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर ५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने गुणनियंत्रण योजनेत बियाणे, कीटकनाशके यांच्या दर्जा आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठी जिल्हास्तरावर १, तालुकास्तरावर १३ अशी १४ भरारी पथके आहे. ही पथके बियाणे, खते, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्याचे काम पार पडते. भरारी पथकात १ पूर्ण वेळ आणि ४१ अर्धवेळ निरीक्षक कृषी सेवा तपासणीची मोहीम पार पाडत आहे. जिल्ह्यातील भरारी पथकाने केलेल्या पाहणीत पाथर्डी तालुक्यातील ४ व राहाता तालुक्यातील १ अशा ५ ठिकाणी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री होत असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी संबंधित कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे परवाना असताना दुकाने कायमस्वरूपी बंद असल्याचे आढळून आलेले संगमनेर १, नेवासा १, श्रीरामपूर १, नेवासा १, श्रीरामपूर १ आणि शेवगाव २ अशा ६ कृषिसेवा केंद्राचे खते, बियाणे, कीटकनाशके यांचे परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी दिली.एमआरपीपेक्षा अधिक दराने खते, बियाणे यांची विक्री होत असल्यास कृषी विभाग आणि पंचायत समिती विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन नलगे यांनी केले आहे.