शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

२१ कृषी केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:08 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १६ कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर ५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने गुणनियंत्रण योजनेत बियाणे, कीटकनाशके यांच्या दर्जा आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठी जिल्हास्तरावर १, तालुकास्तरावर १३ अशी १४ भरारी पथके आहे. ही पथके बियाणे, खते, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्याचे काम पार पडते. भरारी पथकात १ पूर्ण वेळ आणि ४१ अर्धवेळ निरीक्षक कृषी सेवा तपासणीची मोहीम पार पाडत आहे. जिल्ह्यातील भरारी पथकाने केलेल्या पाहणीत पाथर्डी तालुक्यातील ४ व राहाता तालुक्यातील १ अशा ५ ठिकाणी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री होत असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी संबंधित कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे परवाना असताना दुकाने कायमस्वरूपी बंद असल्याचे आढळून आलेले संगमनेर १, नेवासा १, श्रीरामपूर १, नेवासा १, श्रीरामपूर १ आणि शेवगाव २ अशा ६ कृषिसेवा केंद्राचे खते, बियाणे, कीटकनाशके यांचे परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी दिली.एमआरपीपेक्षा अधिक दराने खते, बियाणे यांची विक्री होत असल्यास कृषी विभाग आणि पंचायत समिती विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन नलगे यांनी केले आहे.