शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

३५५ गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

अहमदनगर: सन २०१३-१४ मधील रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पेक्षा कमी असणारी जिल्ह्यातील ३५५ गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़

अहमदनगर: सन २०१३-१४ मधील रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पेक्षा कमी असणारी जिल्ह्यातील ३५५ गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ टंचाईग्रस्त घोषित गावातील खातेदारांना विविध सवलती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़रब्बी हंगामात अत्यल्प पाऊस पडला आहे़ कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यातील गावांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले़ प्रत्येक गावातील माहिती घेऊन टंचाईग्रस्त गावांचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सात तालुक्यातील ३५५ गावांची पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी निघाली आहे़ त्यामुळे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत़या सवलतीस टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ पात्र ठरतील़ टंचाईग्रस्त गावात नगर तालुक्यातील सर्वाधिक ९५ गावांचा समावेश आहे़जून महिना कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ वेळेत पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत़ रब्बी हंगामात पाऊस न पडलेल्या गावांत भीषण टंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे वरील घोषणा करण्यात आली असून, घोषित गावातील खातेदारांना महसुलात सूट दिली जाईल़ सहकारी कर्जाचे रुपांतर करून कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल़ टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज खंडित न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळणार आहे़ (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांची दांडीपालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी बैठकीचे नियोजन केले होते़ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने सर्व विभागाचे प्रमुख फायलींचे गठ्ठे घेऊन हजर होते़ परंतु पालकमंत्री आलेच नाहीत़ तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावेकोपरगाव-६३श्रीरामपूर-५६राहाता-३६राहुरी-९नेवासा-३९नगर-९५पाथर्डी-५७काय आहे सवलतजमीन महसुलात सूटसहकारी कर्जाचे रुपांतरपरीक्षा शुल्कात माफीरोहयोअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलताशेती पंपाची वीज खंडित न करणे