शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात

By admin | Updated: June 6, 2014 13:44 IST

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे.

अहमदनगर : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे़ वादळी वारे व विजेच्या कडकडाटामुळे विद्युत रोहित्रे नादुरुस्त होऊन वीज पुरवठा विस्कळीत झाला असून, मध्यवर्ती शहरासह जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़शहरासह जिल्ह्यात सध्या तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे़ त्यामुळे रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातो़ त्यात आता वादळी वार्‍यासह होणार्‍या पावसाचीही भर पडली आहे़ पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले असून, शहरासह जिल्हा अक्षरश: अंधारात चाचपडतो आहे़ पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित केला होता, हे विशेष़ दुरुस्तीचे काम होऊनही महावितरणची दाणादाण उडालीच़ वादळाने विद्युत खांब कोसळले़ काही ठिकाणी तारा तुटल्या़ त्यामुळे भर पावसात वीज गायब झाली़ त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली़ मध्यवर्ती शहरातील विद्युतभवनमधील रोहित्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास नादुरुस्त झाले़ मुळा धरणाकडे जाणारी वीज खंडित झाली़ वसंत टेकडीचे रोहित्रही बंद पडले़ परिणामी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला़ वसंत टेकडी येथील रोहित्र सुरू करण्यात कर्मचार्‍यांना पहाटे चार वाजता यश आले़ त्यामुळे काही भागाला पाणी देणे शक्य झाले़ सावेडी उपनगरातील रोहित्र रात्री ८़ ३० वाजता नादुरुस्त झाले़ त्यामुळे शेंडी गाव रात्रभर अंधारात होते़ जिल्ह्यात तर यापेक्षाही भयावह स्थिती असून, जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात भारनियमन सुरू आहे़ त्यात आता तातडीच्या भारनियमाची भर पडली़ त्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतानाच वादळी वार्‍याने वाड्या -वस्त्यांवरील वीज अचानक गायब झाली़ काल बुधवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील एक हजार १०० विद्युत खांब कोसळले़ तारा तुटल्या असून, वीजपुरवठा खंडित झाला़ विद्युतपुरवठा खंडित झालेल्या गावांची माहिती घेऊन दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ बहुतांश रोहित्र विजेच्या कडकडाटाने नादुरुस्त झाले आहेत़ आकाशातून पडणार्‍या विजेचा दाब प्रचंड असल्याने रोहित्र नादुरुस्त होतात़ ते दुरुस्त करणे शक्य आहे़ परंतु खांब उभे करून तारा जोडणे, ही कामे करणे कठीण आहे़ परिणामी ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागतील,असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे़