शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्ह्यात एक पालक गमाविलेली १२६ मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. अशा कोरोनाकाळात पालकांच्या ...

कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. अशा कोरोनाकाळात पालकांच्या मृत्युमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींची अगदी गाव पातळीपासूनची माहिती संकलित करून ती जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे सादर कऱण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनीही अशा मुलांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडकाळात पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तर कृतीदलाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीला यंत्रणेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची देखभाल करणाऱ्या नातेवाइकांचीही माहिती संकलित करून या मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची माहिती घेऊन त्याची नोंद तपासणी अहवालात घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य, हक्क मिळवून देऊन त्यांचे योग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने उपाययोजना आवश्यक आहेत. त्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत देण्यात येणार आहे. या दृष्टिने अधिकाऱ्यांनी गृहभेटी कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

तसेच, घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गमावल्याने विधवा झालेल्या महिलांनाही राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाने पालकत्व गमावलेल्या मुलांची माहिती संकलित केली जात असून, त्यांची सामाजिक तपासणीही केली जात आहे.