शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

अध्यात्मिक आचरण

By admin | Updated: August 9, 2016 14:11 IST

प्राप्त परिस्थितीत स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचा, समाजाचा नेकीने, सचोटीने आचारविचार आणि व्यवहार करून विकास साधणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
प्राप्त परिस्थितीत स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचा, समाजाचा नेकीने, सचोटीने आचारविचार आणि व्यवहार करून विकास साधणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. पण याच्याही थोडे पलीकडे पाहण्याचा विचार करून तशी कृती करण्याला ‘अध्यात्मिक आचरण’ म्हणता येईल. यात बहुजन सुखाय, बहुजन हिताय ही आचारविचारधारा अपेक्षित असते.
स्वत: सुखी-समृद्ध होणे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. परंतु इतरांसाठीही काही करण्यास प्रेरणा देणारी कै. दत्ता हसलगीकरांची कविता अध्यात्मिक आचरणाला बळ देणारी ठरेल.
‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत,
ज्यांचे स्वर जुळून आले, त्यांनी गाणी गावीत,
आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे,
मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे,
जे आहेत रंजले गांजले, त्यांना आपले म्हणावे.’
स्वत:ची कुशलता, कठोर परिश्रम, बुद्धीचातुर्य, काल-सुसंगतता आदि वापरून स्वत:चा विकास साधण्यास कुणाचीच हरकत नसते. पण यात इतरांच्याही सुखासमाधानाचा, आनंदाचा विसर पडू नये. हा मनोभाव महत्त्वाचा आहे. पण यशाच्या उन्मादात कधीकधी संत कबिरांनी वर्णन केलेल्या खजुराच्या झाडासारखी अवस्था होते.
‘बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेंड खजूर ।
पंथीयों को छाया नाही, फल लगे अती दूर।।’
खजुराच्या झाडासारखे मोठेपण, संपन्नता काय कामाची? वाटसरूला भूक लागली तर ती भूक भागविण्यासाठी त्याला खजूरही मिळत नाही. कारण खजुराचे झाड उंच असते. त्याला फांद्याचा विस्तारही फारसा नसतो. अशा या खजुराच्या झाडाच्या छायेत बसावे तर वाटसरूला सावलीही मिळत नाही, असे मोठेपण काय कामाचे?
अध्यात्मिक आचरणात व्यक्तीचं मोठेपण ती व्यक्ती इतरांच्या भल्यासाठी कशी जगली यात आहे. स्वत:च्या घरावर तुळशीपत्रं ठेवून जगणे हे येथे अपेक्षित नाही. पण भुकेलेल्याची भूक, तहानलेल्याची तहान जाणणे, त्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करणे यालाच ‘अध्यात्मिक आचरण’ म्हणता येईल. भलेही ती व्यक्ती मठ, मंदिर, चर्च, गुरुद्वारा वा अन्य धार्मिक स्थळावर जात असो अगर नसो.