शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

स्वधर्म

By admin | Updated: August 9, 2016 14:07 IST

अनेकांना आपापला धर्म श्रेष्ठ व पवित्र वाटतो. ‘धरून ठेवतो तो धर्म’ त्या-त्या धर्माचे चांगले आचार-विचार मनात रूजवून जी व्यक्ती तशी वागते त्या व्यक्तीस धार्मिक म्हणावे,

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
अनेकांना आपापला धर्म श्रेष्ठ व पवित्र वाटतो. ‘धरून ठेवतो तो धर्म’ त्या-त्या धर्माचे चांगले आचार-विचार मनात रूजवून जी व्यक्ती तशी वागते त्या व्यक्तीस धार्मिक म्हणावे, असा सर्व संत वाङमयाचा आशय व सारांश आहे. पण ‘स्वधर्म’ म्हणजे स्वत: अतिशय काटेकोर, शिस्तबद्ध करावयाचे एखादे स्वीकृत कार्य अथवा काम.
‘माझ्या वैयक्तिक धार्मिक पूजे-अर्चेपेक्षाही ‘स्वराज्य’ प्राप्तीचा माझा प्रयत्न ही माझी सर्व श्रेष्ठ पूजा आहे’, असा स्वधर्म सांगणारे लो. टिळक, दु:खी, पीडितांची सेवा करण्यात संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज इ.नी ‘स्वधर्म’ ओळखला. कुष्ठरोग्यात कै. बाबा आमट्यांना ‘स्वधर्म’ दिसला. ‘स्वधर्म’ निष्ठेने, आयुष्यभर पाळणारी अशी अनेक उदाहरणे विविध लहान-मोठ्या क्षेत्रात आहेत. क्षेत्र झगमगाटी असेल, नसेलही पण त्यात स्वीकारलेला स्वधर्म श्रेष्ठ असतो.
एकदा रामकृष्णांकडे काही खेडूत आले, कालीमातेचे दर्शन घेऊन एका शेतकऱ्याबाबत ते तक्रार करू लागले की, त्या शेतकऱ्याला येथे दर्शनास येण्याचा आग्रह करूनही तो येथे न येता त्याच्या शेतात काम करीत राहिला. त्यावर रामकृष्ण म्हणाले, ‘असू दे त्याने काही बिघडत नाही. तो त्याचा शेतात राबण्याचा ‘स्वधर्म’ तर करतो आहे ना? खरं तर येथे दर्शनास येण्यापेक्षा तुम्हा सर्वांनाच त्या स्वधर्माची खूप गरज आहे.’ ते खेडूत काय समजायचे ते समजून चुकले.
न्याय निष्ठूर रामशास्त्री प्रभुणे जेव्हा-जेव्हा पेशव्यांना भेटण्यास जात तेव्हा तेव्हा पेशवे पूजेअर्चेत असल्यामुळे त्यांना तीन-चार तास त्यांची वाट पहात थांबावे लागे. एकदा त्यांनी नम्रपणे, ठामपणे पेशव्यांना सांगितले, ‘श्रीमंत ! आपण रयतेचे पालनपोषणकर्ते, यातला बराच वेळ त्यांच्यासाठी दिला तर ते अधिक योग्य ठरेल.’ अशा शब्दात पेशव्यांना त्यांच्या स्वधर्माची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा ‘स्वधर्मयज्ञी’ राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘स्वधर्म प्रथम आचरावा । तद्नंतर विठ्ठल भजावा ।।’ या संत उक्तीप्रमाणे जर झाले तर तीर्थस्थळावर होणारी गर्दी कमी होईल व अनेक कार्ये सुरळीत होतील.