शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘‘मृत्यूचं भान’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:00 IST

सकल सृष्टी पंचमहाभूतांनी युक्त आहे. या सृष्टीमध्ये असणाऱ्या योनी, जीव हेदेखील पंचमहाभूतांनी युक्त आहेत. त्यात मानव योनी सर्वश्रेष्ठ आहे. मानवाच्या देहात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं विशिष्ट प्रमाण आहे.

- कौमुदी गोडबोलेसकल सृष्टी पंचमहाभूतांनी युक्त आहे. या सृष्टीमध्ये असणाऱ्या योनी, जीव हेदेखील पंचमहाभूतांनी युक्त आहेत. त्यात मानव योनी सर्वश्रेष्ठ आहे. मानवाच्या देहात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं विशिष्ट प्रमाण आहे. जो जीव जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू हे सत्य आहे. या सत्याचा स्वीकार सहजपणानं केला की मृत्यूचं भय वाटत नाही. अवती भवती शेकडो बाळं जन्म घेतात. त्याचक्षणी शेकडो लोक मृत्यू पावतात. उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्था माणसालादेखील असतात. माणूस जन्म घेतो, वाढतो, शेवटी लयाच्या अवस्थेला पोहोचतो. म्हणजे मृत्यूच्या कराल दाढेखाली येतो. जन्म-मृत्यूचे फेरे सतत चालूच राहतात.मृत्यूचं भान ठेवलं की माणूस विनम्रपणानं वर्तन करतो. ज्याला हे भान नसतं तो गुणांचा आभास निर्माण करून गर्वानं फुगतो. स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजतो. इतरांना तुच्छ लेखू लागतो.देहाच्या नश्वरतेची जाणीव समर्थ रामदास स्वामींनी यथार्थ शब्दात करून दिली आहे. देह कायमस्वरूपी नाही. त्याचा नाश होणार, याचा स्वीकार केला की माणसाचे पाय जमिनीवर टेकतात. वास्तव येतं. मनुष्य देह पंचमहाभूतांचा बनलेला असल्यामुळे तो पंचमहाभूतांमध्येच मिसळून जाणार. मृत्यू श्रीमंत, गरीब, राजा- रंक, याचा मृत्यू विचार करती नाही. तो स्त्री-पुरुष, जात-पंथ हा भेदही करत नाही. सगळ्यांना समान न्याय लावणारा मृत्यू श्रेष्ठ आहे. मृत्यू कोणत्या वेळी येणार हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे कशाप्रकारे येणार याची कुणाला कल्पना करता येत नाही. कोणत्या स्थानी येईल हेही ज्ञात नसतं. गूढ, गहन, गंभीर असणारा मृत्यू! त्याचं कोडं उकलता उकलत नाही.प्रत्येकाला मृत्यूच्या स्वाधीन व्हायचं असतं. मग नाशिवंत देहाचा अहंकार, गर्व, ताठा कशासाठी? मृत्यू भगवंतानं स्वत:च्या हातात ठेवलेला आहे. त्यामुळे भगवंताला प्रार्थना करायची की, ‘‘षड्रिपू नाहीसे होऊ दे.’’ आनंद, स्वानंद, परमानंदाची प्राप्ती करण्याची सद्बुद्धी प्रदान कर. सर्वांप्रति प्रेमभाव, चित्तामध्ये राहू दे.’’ जन्म देणारा आणि मृत्यूचं दान देणारा भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या स्मरणात राहणाºयाला मृत्यूची वेगळी तयारी करावी लागत नाही. तो वासनांचं गाठोडं दूर भिरकावून नि:संग होऊन मृत्यूच्या स्वागतासाठी सज्ज असतो. समाधानाचा सुगंध लेवून जगणाºयाला मृत्यूच्या आगमनाचा आनंद वाटतो. मृत्यू समवेत प्रवास करणं ही त्याच्यासाठी एक ‘आनंदयात्रा’ होऊन जाते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक