शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विकत घेतला श्याम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:04 IST

साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते.

- डॉ. रामचंद्र देखणेसाहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते. काहींच्या शब्दांवर कुणाचा तरी प्रभाव असतो. कुणीतरी कुणाच्या तरी विचाराने प्रभावित होऊन आपले विचार मांडत असतात. एखादी निर्मितीदेखील पूर्णत: स्वयंभू आहे, असे वाटते. काही वेळा एखादी मूळ शब्दकृतीच पुन्हा नवे रूप घेऊन नव्या रूपाने स्वयंभू होऊन प्रकटते. अशी गमतीशीर उदाहरणे प्रतिभावंतांच्या जीवनात घडत असतात. प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठीनाही खरचली कवडी दमडी ।नाही वेचिला दाम ।बाई मी विकत घेतला श्याम ।।ही अतिशय सुंदर रचना लिहिली. ते गाणे आजही गुणगुणत राहावेसे वाटते. शब्दांची मधुरता आणि कल्पनेची सुरेखता गदिमांनी प्रत्येक चरणामध्ये ओतली आहे. हे गाणे मीराबार्इंच्या एका सुंदर हिंदी अभंगावरून सुचले आहे, हे गदिमांनी मान्य केले होते आणि संगीतकार सुधीर फडके यांनीही याच्या पाठीशी असलेल्या मीराबार्इंच्या रचनेचे मोठेपण सांगितले होते. संत मीराबार्इंची गौळणसदृश एक रचना आहे-‘माई मैं ने गोविंद लीन्हो मोल ।कोई कहे हलका, कोई कहे भारीलियो तराजू तोल।।मी तराजू मांडून गोविंदाला तोलून त्याचे मोल देऊन त्याला घेतलंय. ‘कोई कहे अनमोल’ असे हे गोविंदधन मला सहजासहजी मिळालेले नाही. मीराबार्इंची हीच संकल्पना गदिमा त्या गीतातून विस्तारतात आणि जन्मभराच्या श्वासाइतके हरिनाम मोजून मी त्याला विकत घेतलाय, असे सांगतात. प्रतिभावंतांच्या रचनांमध्ये समानता असते. कल्पना विस्ताराचे आणि कल्पकतेचे सौंदर्य असते; पण ते शब्दसौंदर्यही संतरचनेच्या प्रासादिक अभंगवाणीला समोर ठेवून जेव्हा अभिव्यक्त होते तेव्हा कविता आणि गीतही संतवाणीच्या अवस्थेला जाऊन पोहोचते.गदिमांचा संतसाहित्याचा व्यासंग, अभ्यास आणि वाचन किती सूक्ष्म होते हे सांगायला नको. ‘गोविंद लीन्हो मोल’ आणि ‘विकत घेतला श्याम’ या दोन्ही रचना पाहिल्यावर मीराबार्इंचे भजन गदिमांच्या शब्दाने पुन्हा प्रकटते आणि दोन्ही रचनांमधून नामसंकीर्तन उभे राहते. तसेच गदिमांच्या प्रासादिक प्रतिमेचे उत्तुंग दर्शन घडते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक