शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

विकत घेतला श्याम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:04 IST

साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते.

- डॉ. रामचंद्र देखणेसाहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते. काहींच्या शब्दांवर कुणाचा तरी प्रभाव असतो. कुणीतरी कुणाच्या तरी विचाराने प्रभावित होऊन आपले विचार मांडत असतात. एखादी निर्मितीदेखील पूर्णत: स्वयंभू आहे, असे वाटते. काही वेळा एखादी मूळ शब्दकृतीच पुन्हा नवे रूप घेऊन नव्या रूपाने स्वयंभू होऊन प्रकटते. अशी गमतीशीर उदाहरणे प्रतिभावंतांच्या जीवनात घडत असतात. प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठीनाही खरचली कवडी दमडी ।नाही वेचिला दाम ।बाई मी विकत घेतला श्याम ।।ही अतिशय सुंदर रचना लिहिली. ते गाणे आजही गुणगुणत राहावेसे वाटते. शब्दांची मधुरता आणि कल्पनेची सुरेखता गदिमांनी प्रत्येक चरणामध्ये ओतली आहे. हे गाणे मीराबार्इंच्या एका सुंदर हिंदी अभंगावरून सुचले आहे, हे गदिमांनी मान्य केले होते आणि संगीतकार सुधीर फडके यांनीही याच्या पाठीशी असलेल्या मीराबार्इंच्या रचनेचे मोठेपण सांगितले होते. संत मीराबार्इंची गौळणसदृश एक रचना आहे-‘माई मैं ने गोविंद लीन्हो मोल ।कोई कहे हलका, कोई कहे भारीलियो तराजू तोल।।मी तराजू मांडून गोविंदाला तोलून त्याचे मोल देऊन त्याला घेतलंय. ‘कोई कहे अनमोल’ असे हे गोविंदधन मला सहजासहजी मिळालेले नाही. मीराबार्इंची हीच संकल्पना गदिमा त्या गीतातून विस्तारतात आणि जन्मभराच्या श्वासाइतके हरिनाम मोजून मी त्याला विकत घेतलाय, असे सांगतात. प्रतिभावंतांच्या रचनांमध्ये समानता असते. कल्पना विस्ताराचे आणि कल्पकतेचे सौंदर्य असते; पण ते शब्दसौंदर्यही संतरचनेच्या प्रासादिक अभंगवाणीला समोर ठेवून जेव्हा अभिव्यक्त होते तेव्हा कविता आणि गीतही संतवाणीच्या अवस्थेला जाऊन पोहोचते.गदिमांचा संतसाहित्याचा व्यासंग, अभ्यास आणि वाचन किती सूक्ष्म होते हे सांगायला नको. ‘गोविंद लीन्हो मोल’ आणि ‘विकत घेतला श्याम’ या दोन्ही रचना पाहिल्यावर मीराबार्इंचे भजन गदिमांच्या शब्दाने पुन्हा प्रकटते आणि दोन्ही रचनांमधून नामसंकीर्तन उभे राहते. तसेच गदिमांच्या प्रासादिक प्रतिमेचे उत्तुंग दर्शन घडते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक