शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

अस्मिता-अभिमान-परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:26 IST

वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते.

- डॉ. रामचंद्र देखणेवैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. माणूस हा काही मूल्ये, काही संस्कार, काही परंपरा आणि काही आदर्श घेऊनच जगत असतो. हे आदर्श, ही परंपरा, हे संस्कार त्याला एकीकडे जगण्याला आनंद देतात तर दुसरीकडे जगण्याची दिशा. त्याच्यावर घडणाऱ्या संस्काराप्रमाणे किंवा विचारप्रणालीप्रमाणे तो वागत असतो. आणि त्या परंपरेचा अभिमान बाळगत असतो. एकीकडे अभिमान हा महान सतकृती ठरतो तर दुसरीकडे वृथा अहंकार व त्याचा अभिमान ही विकृतीही. देश, संस्कृती, भाषा, भूमी, आई-वडील, घराणे, गाव या विषयीचा अभिमान हा एका संस्कृतीलाच उभा करतो. माझ्या घरी पंढरीची वारी आहे. माझ्या आजोबांपासून आमच्या घरात प्रत्येक पिढीत एक एक शिक्षक आहेत.सातारा जिल्ह्यात एक गाव असे आहे की, त्या गावातील प्रत्येक घरातील एक माणूस सैन्यदलात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. गावकºयांना गावच्या या परंपरेचा अभिमान आहे. म्हणून अभिमानाची परंपरा बाळगण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा. ज्ञानदेवही काही वेळा अभिमानाचा अविष्कार घडवतात.तयाचिये देशींच्या झाडी। कल्पतरुते होडी।न जिणावे का एवढी।मायबापे असता।। (ज्ञानेश्वरी १८/१६४२)ते पाषाणही आघवे। चिंतारत्ने का नोहावे।तिये भूमिके का न यावे।चैतन्याच।। १८-१६४३ज्ञानदेव म्हणतात, ज्या देशात ऐश्वर्यशक्तीचा महामेरू भगवान कृष्ण आहे आणि समृद्धीचा आगर असणारी साक्षात लक्ष्मी ही वास करते आहे. तिथल्या माणसांनी करंटे का राहावे? त्या देशातील झाडांनी कल्पतरुची बरोबरी का करू नये? तिथल्या सर्व दगडांनी चिंतामणी का होऊ नये? आणि तिथल्या भूमिलाही चैतन्यत्व का प्राप्त होऊ नये? तिथल्या नद्या अमृत घेऊन का वाहू नयेत? आणि तिथल्या माणसांना ‘सच्चिदानंद पद’ का लाभू नये? मानवी जीवनाला वैराग्य, अनासक्ती, शमदम यासारख्या निवृत्तीवादात अडकविणारे ज्ञानदेवांचे विचार नाहीत तर आदर्शाची अस्मिता जागवून पुरुषार्थप्रधान आनंद देणारे शुभ प्रवृत्तीवादी विचार आहेत. निवृत्तीवादी तत्त्वांचे रक्षण होण्यासाठी शुद्ध प्रवृत्तीवाद जपायला हवा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक