शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

अस्मिता-अभिमान-परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:26 IST

वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते.

- डॉ. रामचंद्र देखणेवैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. माणूस हा काही मूल्ये, काही संस्कार, काही परंपरा आणि काही आदर्श घेऊनच जगत असतो. हे आदर्श, ही परंपरा, हे संस्कार त्याला एकीकडे जगण्याला आनंद देतात तर दुसरीकडे जगण्याची दिशा. त्याच्यावर घडणाऱ्या संस्काराप्रमाणे किंवा विचारप्रणालीप्रमाणे तो वागत असतो. आणि त्या परंपरेचा अभिमान बाळगत असतो. एकीकडे अभिमान हा महान सतकृती ठरतो तर दुसरीकडे वृथा अहंकार व त्याचा अभिमान ही विकृतीही. देश, संस्कृती, भाषा, भूमी, आई-वडील, घराणे, गाव या विषयीचा अभिमान हा एका संस्कृतीलाच उभा करतो. माझ्या घरी पंढरीची वारी आहे. माझ्या आजोबांपासून आमच्या घरात प्रत्येक पिढीत एक एक शिक्षक आहेत.सातारा जिल्ह्यात एक गाव असे आहे की, त्या गावातील प्रत्येक घरातील एक माणूस सैन्यदलात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. गावकºयांना गावच्या या परंपरेचा अभिमान आहे. म्हणून अभिमानाची परंपरा बाळगण्यापेक्षा परंपरेचा अभिमान बाळगावा. ज्ञानदेवही काही वेळा अभिमानाचा अविष्कार घडवतात.तयाचिये देशींच्या झाडी। कल्पतरुते होडी।न जिणावे का एवढी।मायबापे असता।। (ज्ञानेश्वरी १८/१६४२)ते पाषाणही आघवे। चिंतारत्ने का नोहावे।तिये भूमिके का न यावे।चैतन्याच।। १८-१६४३ज्ञानदेव म्हणतात, ज्या देशात ऐश्वर्यशक्तीचा महामेरू भगवान कृष्ण आहे आणि समृद्धीचा आगर असणारी साक्षात लक्ष्मी ही वास करते आहे. तिथल्या माणसांनी करंटे का राहावे? त्या देशातील झाडांनी कल्पतरुची बरोबरी का करू नये? तिथल्या सर्व दगडांनी चिंतामणी का होऊ नये? आणि तिथल्या भूमिलाही चैतन्यत्व का प्राप्त होऊ नये? तिथल्या नद्या अमृत घेऊन का वाहू नयेत? आणि तिथल्या माणसांना ‘सच्चिदानंद पद’ का लाभू नये? मानवी जीवनाला वैराग्य, अनासक्ती, शमदम यासारख्या निवृत्तीवादात अडकविणारे ज्ञानदेवांचे विचार नाहीत तर आदर्शाची अस्मिता जागवून पुरुषार्थप्रधान आनंद देणारे शुभ प्रवृत्तीवादी विचार आहेत. निवृत्तीवादी तत्त्वांचे रक्षण होण्यासाठी शुद्ध प्रवृत्तीवाद जपायला हवा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक