काय सांगता? अभिषेक बच्चनला रोज रात्री झोपण्यापूर्वी मागावी लागते ऐश्वर्याची माफी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:08 PM2021-11-19T13:08:17+5:302021-11-19T13:18:52+5:30

हेच तर Aishwarya Rai व Abhishek Bachchanच्या सुखी संसाराचं रहस्य नाही?

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडचं एक लोकप्रिय कपल. लग्नाला 14 वर्ष झालीत पण दोघांमधील बॉन्डिंग आजही तितकंच मजबूत आहेत.

नाही म्हणायला सामान्य जोडप्यात होतात तशी भांडणं त्यांच्यातही होतात. पण हे भांडण कधीही विकोपाला गेलं नाही. अर्थात यामागे एक मोठ्ठ सीक्रेट आहेत.

होय, एका मुलाखतीत दोघांनीही हे सीक्रेट उघड केलं आणि ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

होय, रोज रात्री झोपण्यापूर्वी अभिषेक ऐश्वर्याची माफी मागतो. यामुळे गेल्या 14 वर्षांपासून दोघांचाही संसार अगदी सुखात सुरू आहे.

अभिषेक यावर म्हणाला, सामान्य कपलमध्ये होतात तशी भांडण आमच्यातही होतात. पण अशी भांडण नसतील तर संसारात मज्जा ती काय?

आमची भांडणं कधीच विकोपाला जात नाही. याचं कारण म्हणजे आम्ही दोघांनी भांडण करून झोपायचं नाही, असं ठरवलं आहे. म्हणून मी रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐश्वर्याची माफी मागतो, असं अभिषेक म्हणाला.

तसंही स्त्रिया आपली चूक कधीचं मान्य करत नाहीत, त्यामुळे अनेक भाडणांमध्ये पुरूषाला माफी आणि माघार घ्यावी लागते..., असंही हसत हसत त्यानं सांगितलं.

ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता.

Read in English