भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:19 IST2026-01-17T14:18:05+5:302026-01-17T14:19:12+5:30
"मी आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत आहे की, लोकांमध्ये राहा, ज्या प्रभागांतून आपण विजयी झाला आहात, तेथे विकासाची कामे करून घ्या..."

भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
एक चांगाल निकाल आला आहे. मला आशा आहे की आमचे जे नगरसेवक जिंकूण आले आहेत, ते जनतेच्या आशांवर खरे उतरतील. मी यापूर्व म्हणालो होतो, विजयी होणे आवघड वाडते. मात्र जिंकल्यानंतर आपल्याला लोकांच्या आशांवर खरे उतरावे लागते. त्यांच्यासाठी काम करावे लागते. आपण निवडणुकीदरम्यान जी आश्वासने दिली आहेत, त्यावर कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे. मी आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत आहे की, लोकांमध्ये राहा, ज्या प्रभागांतून आपण विजयी झाला आहात, तेथे विकासाची कामे करून घ्या," असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
ओवेसी म्हणाले, "आपले अनेक हिंदू बंधू, दलीत बंधूही निवडून आले आहेत. मुंबईत मानखूर्द शिवाजीनगर भागात आमचे ६ जण नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. त्या विधानसभेत मतदारसंघात, आठ होते त्यांपैकी ६ जिंकले. यात तीन जण यशस्वी झाले. बीएमसीमध्ये एआयएमआयएमचे ८ जण निवडून आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही आम्हाला मोठे यश मिळाले आहे. तेथे आमचे ३३ जण निवडून आले आहेत. याशिवाय मालेगाव, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, येथेही आमचे उमेदवार जिंकले आहेत. मला आशा आहे की आपण चांगल्या पद्धतीने काम करू."
ओवेसी पुढे म्हणाले, "तसेच मी जेथे जेथे एआयएमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यांनी पॉलिसी मॅटरमध्ये, पक्षाचा निर्णय होईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये. त्यासंदर्भात आपल्यासोबतही चर्चा होईलच. त्यांनंतरच निर्णय घेतला जाईल."
दरम्यान, भाजपवरून आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप होत असतात, आता ते आरोपांवरून प्रश्न निर्माण झाला आहे की, मॅच फिक्स होती भाजपसोबत? असे विचारले असता, "जे आरोप लावतात, हैदराबादमद्ये एक म्हण आहे, गिरे तोभी टांग उपर, आता माझ्याकडे त्याचा काही इलाज नाही. आपण आरोप करा मला काही फरक पडत नाही. मात्र, त्यांना एक गोष्ट समजायल हवी की आपण, हे जे काही बोलत आहात, ज्यांनी आम्हाला निवडून दिले आहे, त्यांना आणखी दुखावाल तर, आपले आणखी नुकसान होईल," असे ओवेसी म्हणाले.