Panchayat 4: सचिवजींना नीना गुप्तांपेक्षा जास्त मानधन, 'पंचायत ४'साठी कोणी किती पैसे घेतले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:33 IST2025-06-11T11:23:25+5:302025-06-11T11:33:31+5:30
'पंचायत ४'साठी कोणी किती मानधन घेतलंय हे आता समोर आलं आहे. सीरिजप्रमाणेच मानधनाच्या बाबतीतही सचिवजी वरचढ ठरले आहेत.

भारतातील ओटीटीवर गाजलेल्या आणि सर्वाधिक प्रेम मिळालेल्या सीरिजपैकी एक म्हणजे 'पंचायत'. लवकरच 'पंचायत ४'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'पंचायत'मधील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सचिवजीपासून ते प्रधानजी पर्यंत, रिंकू, मंजू देवी, बिनोद अशा सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं.
'पंचायत'मध्ये सचिवजीची भूमिका साकारून अभिनेता जितेंद्र कुमारने प्रसिद्धी मिळवली. तर नीना गुप्ता, रघुबीर यादव, अशोक पाठक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर अशी स्टारकास्ट या सीरिजची आहे.
'पंचायत ४'साठी कोणी किती मानधन घेतलंय हे आता समोर आलं आहे. सीरिजप्रमाणेच मानधनाच्या बाबतीतही सचिवजी वरचढ ठरले आहेत.
'पंचायत ४'साठी प्रधानजीची भूमिका साकारणारे रघुबीर यादव यांनी एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये फी घेतली आहे. त्यांनी या सीझनसाठी ३.२ लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे.
तर विकासची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉयने एका एपिसोडसाठी २० हजार रुपये आणि 'पंचायत ४'साठी १.६ लाख रुपये मानधन घेतलं आहे.
'पंचायत ४'मध्ये लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता मंजू देवीच्या भूमिकेत आहेत. त्यांना या सीझनसाठी ४ लाख रुपये मिळाले आहेत. तर एका एपिसोडसाठी त्यांनी ५० हजार रुपये आकारले आहेत.
'पंचायत ४'मधून सचिवजी बनून प्रसिद्धी मिळवणारा जितेंद्र कुमारने नीना गुप्ता यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेतलं आहे.
अभिषेक त्रिपाठी ही सचिवजीची भूमिका साकारण्यासाठी जितेंद्र कुमारने एका एपिसोडसाठी ७० हजार घेतले आहेत. तर 'पंचायत ४'साठी त्याने ५.६ लाख रुपये इतकी फी आकारली आहे.