शो बंद होताच कोट्यवधींच्या कर्जात बुडाली 'ही' टॉप अभिनेत्री; रात्री रस्त्यावर राहण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:29 IST2024-12-19T15:19:28+5:302024-12-19T15:29:16+5:30

अभिनेत्रीने अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना केला आहे.

'उतरन'मधून लोकप्रिय झालेल्या टॉप अभिनेत्रीने तिच्या संघर्षावर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, जेव्हा तिचा टीव्ही शो संपला तेव्हा तिचं आयुष्यच ठप्प झालं होतं. कारण तिच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं.

अभिनेत्रीने अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना केला आहे. रश्मी देसाईने ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं.

"मी एक घर विकत घेतलं होतं आणि माझ्यावर २.५ कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्याशिवाय मला आठवतं की माझ्यावर एकूण ३.२५ ते ३.५० कोटी रुपयांचं कर्ज होतं. मला वाटलं सर्व काही ठीक आहे, सामान्य आहे."

"माझा शो अचानक बंद झाला. मी चार दिवस रस्त्यावर राहिले. माझ्याकडे एक Audi A6 होती ज्यामध्ये मी झोपायचे. मी माझं सामान मॅनेजरच्या घरी ठेवलेलं आणि कुटुंबापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

रश्मी देसाईने एक कठीण प्रसंग देखील सांगितला जेव्हा तिला रिक्षावाल्यांसोबत अवघ्या २० रुपयांत जेवावं लागायचं, कधी कधी जेवणात खडेही मिळायचे. ते चार दिवस तिच्या आयुष्यातील खूप कठीण दिवस होते.

रश्मी पुढे म्हणाली, "मला समजलं की, मी कधीही स्वतःबद्दल विचारही केला नव्हता. मी प्रत्येक गोष्टीत इतकी अडकले की मी स्वतःलाच विसरले." बराच वेळ तणावाखाली राहिल्यानंतर रश्मी आता त्यातून बाहेर आली आहे.

अभिनेत्रीने नात्याबद्दल सांगितलं की, "माझा घटस्फोट झाला, मग माझ्या मित्रांना वाटलं की मी जास्त बोलत नाही, मग माझ्या घरच्यांना माझे सर्व निर्णय चुकीचे वाटले."

याआधी एका पॉडकास्टवर रश्मी म्हणाली होती की, "मी शो केले पण शांतपणे झोपली नाही, कधीच ते इतरांना दाखवलं नाही. मी तणावात असल्याचं कोणाला सांगितलं नाही. मला वाटायचं, हे कसलं जीवन आहे? यापेक्षा मरण चांगलं असू शकतं."

रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.