"मला गृहिणीच बनून राहायचं होतं, आई व्हायचं होतं", लग्नानंतर अभिनेत्रीने व्यक्त केलेली इच्छा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:26 IST2025-05-30T13:18:55+5:302025-05-30T13:26:18+5:30
लग्नानंतर दोन वर्षातच अभिनेत्रीचा संसार मोडला...

'दिल मिल गए' मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे करणसिंह ग्रोवर (Karan Singh Grover) आणि जेनिफर विंगेट (Jennier Winget). याच मालिकेवेळी दोघंही प्रेमात पडले आणि त्यांनी २०१२ साली लग्नही केलं.
ही रोमँटिक जोडी चाहत्यांच्या अगदीच आवडीची होती. करणसिंह ग्रोवरशी लग्न केल्यानंतर जेनिफर आनंदात होती. आता मला गृहिणीच बनून राहायला आवडेल असंही ती म्हणाली होती.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणालेली की, "लग्नानंतर करिअर सोडायचं असं मी ठरवलं होतं. माझ्या या निर्णयाला घरातील मंडळींनी विरोध केला होता."
"मला सगळ्यांनीच पुन्हा विचार कर असं सांगितलं होतं. पण मी ऐकलं नाही. कारण मला हाऊसवाईफच राहायचं होतं. मला काम मिळालं नाही तरी काही फरक पडत नव्हता."
जेनिफर एकेकाळी टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. त्यामुळे तिच्या या निर्णयाचा चाहत्यांना धक्का बसला होता. लग्नानंतर दोन वर्षातच तिचा संसार मोडला.
आमिर खान आणि मनीषा कोईरालाच्या 'अकेले हम अकेले तुम' सिनेमात ती बालकलाकाराच्या भूमिकेत होती. तसंच ऐश्वर्या-अभिषेकच्या 'कुछ ना कहो'मध्येही ती झळकली.
नंतर जेनिफरने 'कसौटी जिंदगी की','दिल मिल गए','सरस्वीचंद्र','बेहद' या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली.