आर्यन खान, सारा अली खानपासून नव्या नवेली नंदापर्यंत, हे स्टार किड्स २०२१ मध्ये आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 03:44 PM2021-12-25T15:44:06+5:302021-12-25T15:50:51+5:30

Bollywood Star Kids : बॉलिवूडचे असे काही स्टार किड्स आहेत, जे २०२१ या वर्षात वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यातील तर काही स्टार किड्सचे करिअरदेखील सुरू झाले नाही.

Bollywood Star Kids : बॉलिवूडचे असे काही स्टार किड्स आहेत, जे २०२१ या वर्षात वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यातील तर काही स्टार किड्सचे करिअरदेखील सुरू झाले नाही.

या यादीतला पहिला स्टारकिड आहे शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan). त्याचे ड्रग्स प्रकरणात नाव समोर आले होते. त्यावेळी तो खूप चर्चेत आला होता. जवळपास १४ दिवस तो तुरूंगात होता. त्यावर ड्रग्सचे सेवन केल्याचा आणि इंटरनॅशनल ड्रग ट्राफिकिंगमध्ये जोडले गेल्याचा आरोप झाला होता. त्याची जामिनसाठी हायकोर्टात जावे लागले होते.

शाहरूख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या लंडनमधील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये फिल्म मेकिंगची ट्रेनिंग घेत आहे. कारण सुहाना खानला काही काळ लंडनमध्येच थांबावे लागले होते कारण त्याचा भाऊ आर्यन खानचे ड्रग्स प्रकरणात नाव आले होते. त्यामुळे शाहरूख खानने तिला भारतात न येण्यास मनाई केली होती. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अनन्या पांडे (Ananya Panday) चेदेखील नाव समोर आले होते.

नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) अमिताभ बच्चन यांची नात आहे. तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. ती आर्यन खानची खूप चांगली फ्रेंड आहे. त्यामुळे आर्यन खान ड्रग्स प्रकरणादरम्यान तिचेदेखील नाव चर्चेत आले होते.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले होते. त्यावेळी सारा अली खान (Sara Ali Khan)चेदेखील नाव जोडले गेले होते. त्यावेळी पोलिसांनी तिची चौकशी देखील केली होती. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती. काही लोकांचे म्हणणे आहे की, ही दोन्ही नावे अशा राज्यकर्त्यांची आहेत ज्यांनी भारताला गुलाम बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. तर काही मत याउलट आहे.

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor)ची मुले तैमूर आणि जेह दोघेही खूप लहान आहेत मात्र ते आतापासूनच खूप लोकप्रिय आहेत. तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh)यावर्षी चर्चेत आले होते कारण त्या दोघांची नावे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.