प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'धुरंधर: द रिव्हेंज'चं कौतुक; पण आदित्य धरला म्हणाले, "सावध राहा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:44 IST2026-04-01T10:43:27+5:302026-04-01T10:44:37+5:30
आदित्य तू हुशार आहेसच पण..., काय म्हणाले दिग्दर्शक?

प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'धुरंधर: द रिव्हेंज'चं कौतुक; पण आदित्य धरला म्हणाले, "सावध राहा..."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' बिग स्क्कीनवर धुमाकूळ घालत आहे. 'धुरंधर' सिनेमा गाजल्यानंतर याच्या दुसऱ्या पार्टची सर्वांना उत्सुकता होती. १९ मार्च रोजी 'धुरंधर: द रिव्हेंज' रिलीज झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता रणवीर सिंहच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दुसरीकडे दिग्दर्शक आदित्य धरच्या कौशल्याचीच सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने आदित्य धरला सावध केले आहे.
'द काश्मीर फाईल्स' फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहून प्रतिक्रिया दिली. त्यांना सिनेमा प्रचंड आवडला असून आदित्य धरवर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी x वर लिहिले, "मी कॅलिफोर्नियातील एका गावात होतो आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहण्यासाठी खास लॉस एंजेलिसला गेलो. शाब्बास! आदित्य धर, तू पुन्हा एकदा अप्रतिम काम केले आहेस. मला खरंच समजत नाहीये की काय बोलू..."
पुढे त्यांनी म्हटले, "मी जे काही बोलेन ते कदाचित त्या कलाकृतीसमोर केवळ गोंगाट वाटेल, जी स्वतःच सर्व काही सांगतेय. त्यापेक्षा मी तुला फोनच करेन. प्रत्येकानेच दमदार काम केलं आहे. पण मला त्या दोघांचं नाव घ्यायचंय ज्यांच्याबद्दल कमी बोललं जात आहे. विकास नवलखाची वर्ल्ड क्लास सिनेमॅटोग्राफी आणि साईनी जोहरीची अपवादात्मक प्रोडक्शन डिझाईन.'
ते पुढे म्हणाले, "सिनेमा जगतात, कॅमेरा आणि प्रोडक्शन डिझाईन एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. विकास आणि साईनी दोघांनी कमाल केली आहे. त्यांनी एक बेंचमार्क सेट केला आहे. दोघांचं खूप खूप अभिनंदन."
Dhurandhar: The Revenge
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 30, 2026
I was in the countryside of California, finally made a trip to LA just to watch Dhurandhar.
Shabash. Bravo. Brilliant once again, @AdityaDharFilms. I genuinely don’t know what to say… anything I add may only become noise over something that already…
आदित्य धरचं कौतुक करताना विवेक अग्निहोत्रींनी एक सल्लाही दिला. ते म्हणाले, "आदित्य, तू खूप बुद्धिमान आहेस आणि तुला तुझा मार्ग नीट माहित आहे. पण तुझ्या आजूबाजूच्या वातावरणाबाबत (Ecosystem) थोडा सावध राहा. हे वातावरण जितके आकर्षक वाटते, तितकेच ते धोकादायकही असू शकते. बाकी धुरंधरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, तुम्ही कमाल केली आहे."