ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'नंतर आमिर खान घेणार फिल्म इंडस्ट्रीतून निवृत्ती? स्वत:च दिली हिंट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 09:27 IST2025-06-02T09:25:55+5:302025-06-02T09:27:30+5:30
'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने केली बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा? 'या' सिनेमानंतर देणार करिअरला फुल स्टॉप

ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'नंतर आमिर खान घेणार फिल्म इंडस्ट्रीतून निवृत्ती? स्वत:च दिली हिंट, म्हणाला...
Aamir Khan:बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. दंगल,लगान तसेच पीके यांसारखे दर्जेदार चित्रपट त्याने इंडस्ट्रीला दिले आहेत. लवकरच आमिर खान 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या तो चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने मिस्टर परफेक्शनिस्ट वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतो आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने महाभारत हा त्याचा आगामी ड्रीम प्रोजेक्ट हा शेवटचा सिनेमा असू शकतो, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.
अलिकडेच राज शमानी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खान 'सितारे जमीन पर' नंतर तो फक्त त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'वर लक्ष केंद्रित करेल, असं म्हणाला. त्यादरम्यान संवाद साधताना अभिनेता म्हणाला, "हा प्रोजेक्ट माझं एक स्वप्न आहे. सितारे जमीन पर नंतर मी लगेच महाभारत या चित्रपटाचं काम सुरु करणार आहे. महाभारत हा एक भव्य सिनेमा आहे. तो केल्यानंतर कदाचित माझ्याकडे काही करण्यासारखं उरणार नाही. कारण या प्रोजेक्टचा आशय तसा आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांची कथा आहे. भावना आहेत. शिवाय जगात जे काही अस्तित्वात आहे ते तुम्हाला महाभारत मध्ये पाहायला मिळेल."
त्यादरम्यान, अभिनेत्याने बोलताना महाभारत हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असू शकतो अशी हिंट दिली आहे. त्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, "मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे. आपल्या सर्वांना तेच हवं असतं. पण, हा प्रोजेक्ट केल्यानंतर मला असंही वाटू शकतं की यानंतर मला दुसरं काहीही करायचं नाही." असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. आमिर खानच्या या वक्तव्याने त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.
दरम्यान, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे आमिर खान जवळपास तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तो शेवटचा २०२२ मध्ये आलेल्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसला होता.