अमिताभ- जया यांच्या सहजीवनाची 48 वर्ष...! अन् 24 तासांत उरकलं लग्न...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 10:30 AM2021-06-03T10:30:52+5:302021-06-03T10:40:42+5:30

Amitabh And Jaya Bachchan : अमिताभ-जया बच्चन यांची Wedding Anniversary; अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी

Amitabh Bachchan and Jaya Bachchan 48th wedding anniversary special know about their love story | अमिताभ- जया यांच्या सहजीवनाची 48 वर्ष...! अन् 24 तासांत उरकलं लग्न...!!

अमिताभ- जया यांच्या सहजीवनाची 48 वर्ष...! अन् 24 तासांत उरकलं लग्न...!!

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ यांनी वडिलांच्या इच्छेखातर लग्न करण्याचा निर्णय घेतला.  यानंतर घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Amitabh And Jaya Bachchan) यांचा आज लग्नाचा वाढदिवस. बिग बी व जया यांच्या सहजीवनाला आज 48 वर्षे पूर्ण झालीत.अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बॉलिवूडमधले एक आदर्श जोडपे आहे. या कपलची लव्हस्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे.  (Amitabh And Jaya Bachchan 48th wedding anniversary)

पहिली भेट
अमिताभ व जया यांची पहिली भेट ‘गुड्डी’च्या सेटवर झाली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी अमिताभ आणि जया यांची भेट घालून दिली होती. अमिताभ पहिल्याच नजरेत जया यांच्या प्रेमात पडले होते. पण जया यांना अमिताभ जराही आवडले नव्हते. अर्थात नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

‘बावर्ची’च्या सेटवर बहरले प्रेम
यानंतर ‘बावर्ची’च्या सेटवर अमिताभ व जया यांचे प्रेम बहरले. खरे तर या चित्रपटात जया व राजेश खन्ना लीड रोलमध्ये होते. पण अमिताभ यांना जया यांचा दुरावा सहन होईना. ते रोज ‘बावर्ची’च्या सेटवर जया यांना भेटायला जात.

अन् लग्नाचा निर्णय पक्का झाला, पण...
1973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ‘जंजीर’ हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे दोघेही होते.
‘जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली. तत्पूर्वी  वडील हरिवंशराय यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला आणि जया यांचे नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. 

लंडनला जायचे तर जयासोबत लग्न कर...
लंडनला जायचे असेल आणि जयाही सोबत येणार असेल तर जयासोबत जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊ देणार नाही, असे हरिवंशराय यांनी अमिताभ यांना ठणकावून सांगितले. मग काय? पित्याचा शब्द टाळता येणार नव्हताच आणि लंडनला जायचा बेतही ठरला होता. अखेर अमिताभ यांनी वडिलांच्या इच्छेखातर लग्न करण्याचा निर्णय घेतला.  यानंतर घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. यानंतर दुस-याच दिवशी जया व अमिताभ लंडनसाठी रवाना झालेत.

Web Title: Amitabh Bachchan and Jaya Bachchan 48th wedding anniversary special know about their love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.