बीड: बीड: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा ताफा ज्या रस्त्यावरून जात होता, तिथे अचानक दोन तरुण आले. त्यांनी बॉटलमधून अंगावर पेट्रोल ओतले. हे बघताच पोलिसांनी धाव घेत त्यांना पकडले. यावेळी गोंधळ उडाला होता. बुधवारी सकाळी शहरात ही घटना घडली.
सखी: नवरा की बायको? नात्यात वादाची ठिणगी पहिली कोण टाकतं? पाहा भांडणांला सुरुवात नेमकं कोण करत...
'जिथे भांडण तिथे प्रेम असतं' असं आपण मानतो, पण जेव्हा ही भांडणं रोजची होतात, तेव्हा एक जुना वाद डोकं वर काढतो - तो म्हणजे, ' भांडण आधी कोणी सुरू केलं?' पुरुषांना वाटतं की स्त्रिया विनाकारण जुन्या गोष्टी उकरून काढतात, तर स्त्रियांचं म्हणणं असतं की पुरुषांच्या दुर्लक्षामुळे वादाची ठिणगी पडते. पण, "भांडण आधी नक्की कोणी सुरू केलं?" हा प्रश्न जगातील प्रत्येक घरात विचारला जातो.
छत्रपती संभाजीनगर: इच्छुकांचे एकच मिशन: उमेदवारी; तिकीटासाठी विविध पक्षांत फिल्डिंग!
महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी विविध पक्षांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत तगडी स्पर्धा असून, अनेकजण संधीच्या शोधात आहेत. आर्थिक बाजू आणि जिंकण्याची क्षमता या निकषांवर उमेदवारांची निवड होणार आहे.
बीड: ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक
केजमध्ये ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार. पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांत धाव घेण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. मात्र, युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीला कळंब बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले.
आंतरराष्ट्रीय: मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना मोठा फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (18 डिसेंबर 2025) ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान भारत आणि ओमान यांच्यात मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) करण्यात आला.
महाराष्ट्र: कोर्टाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा
शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याने शिक्षा झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. न्यायालयाने कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांनी राजीनामा दिला.
परभणी: संसार सोडून निघाली, वाटेतच मृत्यू: संशयी प्रियकराने केला विवाहितेचा खून.
परभणी जिल्ह्यात संशयावरून प्रियकराने विवाहितेचा खून केला. रॉडने मारून मृतदेह फेकला. मिसिंग तक्रारीनंतर सीडीआर तपासणीत धक्कादायक गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी धागेदोरे शोधत या खुनाचा उलगडा केला. मुख्य आरोपीचा मोबाइल क्रमांक बंद असल्याने तो हाती लागला नाही.
सखी: घोरण्यामुळे इतरांच्या झोपेचं खोबरं होतं, श्वास घेण्यास अडचणी? सोपे उपाय - घोरणं होईल बंद, झोपही लागेल शांत
घोरणं ही फक्त सवय नसून अनेकदा ते आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या असू शकते. सतत घोरणं श्वास घेताना अडथळा येणं, रात्री अचानक श्वास थांबल्यासारखं वाटणं ही लक्षणं दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. आपण काही सवयी वेळीच सुधारल्या तर घोरण्याची समस्या नक्कीच कमी होऊ शकते.
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद शाळांत बदली झालेल्या १४७६ शिक्षकांची चौकशी होणार!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक बदली घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांमुळे 'संवर्ग-१' मधील १४७६ शिक्षकांची चौकशी होणार. यापूर्वी ९ शिक्षक निलंबित, ४९ जणांच्या चौकशीचे आदेश निघाले, पण यादीच वादग्रस्त ठरली. आता संवर्ग-१ मधील सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार.
व्यापार: सोनं-चांदी महागले: खरेदीआधी आजचे ताजे दर तपासा
चांदीने २,०१,२५० रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला, १,६०९ रुपयांनी वाढ. सोन्याच्या दरातही वाढ, २४ कॅरेट सोन्याचा दर १,३२,४५४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यावर्षी सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, IBJA नुसार.
राष्ट्रीय: 'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब/बुरखा ओढल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून टीकेचा सूर उमटत असून, नितीश कुमारांनी माफी मागण्याची मागणी केली जात आहे. आता बॉलिवूडमधील नामवंत गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रीय: लग्नासाठी, नोकरीसाठी 'राम' जप करा: भाजपा खासदारांनी सांगितला उपाय
मनरेगावरील संसदीय चर्चेत भाजपा खासदार अजय भट्ट यांनी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी 'राम' जपण्याचा सल्ला दिला. विवाह ते नोकरीपर्यंतच्या समस्यांवर तोडगा निघतो, असा दावा करत योजनेच्या नावातील बदलांच्या काँग्रेसच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. आम्ही महात्मा गांधींचा सन्मान आधीसारखाच करत आहोत परंतु जर एखाद्या योजनेत राम शब्द येत असेल तर काँग्रेसला राग येतो असं त्यांनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा पठाण यांची निर्घृण हत्या. कुटुंबियांनी विनवणी करूनही हल्लेखोरांनी पठाण व मुलांवर हल्ला केला. एकाला अटक, इतर फरार. आरोपींवर दंगली व पोक्सोसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मुंबई: माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तंब झाले. काँग्रेसचे नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सातव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्यामागची भूमिकाही मांडली.
जालना: राजूर-देऊळगाव राजा महामार्गावर अपघात; एक ठार, ३० गंभीर जखमी
राजूर-देऊळगाव राजा महामार्गावर टेम्पो आणि मोपेडच्या धडकेत एकाचा मृत्यू, ३० जखमी. मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला. जखमींना टेंभुर्णी रुग्णालयात दाखल केले. मोपेडस्वाराचा जागीच मृत्यू. पोलीस तपास करत आहेत, टेम्पो चालक फरार.
फिल्मी: 'धुरंधर'च्या यशामुळे धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' सिनेमा लांबणीवर? नवी रिलीज डेट जाहीर
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इक्कीस'ची रिलीजआधीपासूनच खूप चर्चा होती. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. काय आहे 'इक्कीस' सिनेमाची नवी रिलीज डेट? जाणून घ्या
सखी: वजन कमी करण्यासाठी कोणती वेळ योग्य? सकाळी की संध्याकाळी?
तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्याचा सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे चालणे. काही जण सकाळी व्यायाम करतात तर काही जण संध्याकाळी. पण अनेकदा प्रश्न पडतो सकाळी चालणं फायदेशीर की संध्याकाळी? तज्ज्ञ काय सांगतात पाहूया.
राष्ट्रीय: "हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशिया बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
गेल्यावर्षी शिक्षण घेण्यासाठी बिकानेरचा अजय गोदरा रशियात गेला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क तुटला होता. त्याच्या कुटुंबीयांकडून पंतप्रधान कार्यालयाकडेही विनवणी करण्यात आली होती. पण, अजयचा मृतदेहच त्याच्या कुटुंबीयांना मिळाला. आता त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
सखी: चालल्यानंतर पाणी कधी प्यावे? आरोग्यासाठी योग्य वेळ आणि नियम
चालून आल्यावर लगेच जास्त पाणी पिणे पचनासाठी हानिकारक. 15-20 मिनिटे थांबा, हळू हळू पाणी प्या, electrolytes संतुलित राहतील.
सखी: रोज मिठी नातं सुधारते, तणाव कमी करते, आरोग्य उत्तम: तज्ज्ञ
मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन वाढतो, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. याने नात्यांमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. नियमित मिठी ब्लड प्रेशर कमी करते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे आरोग्य सुधारते. दिवसातून एकदा 20 सेकंद मिठी मारा.
सांगली: ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीतील दोन जणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. मुलीला फसवून आरोपी तिला एका उसाच्या शेतात घेऊन गेले. मुलीला शंका आली. तिने विरोध करताच आरोपींनी तिला मारहाण करत अत्याचार केले. तिचे कपडे घेऊन आरोपी नंतर तिथून निघून गेले. त्यामुळे विवस्त्र अवस्थेतच मुलीला चालत यावं लागलं. या भयंकर घटनेने ईश्वरपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
सखी: यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल: आजार काय? धोक्याची लक्षणे!
क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिसमुळे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या पोटात आणि आतड्यांमध्ये सूज असल्याचे निदान केले. व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणाऱ्या या आजारात पोटात तीव्र वेदना होतात. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डिहायड्रेशन टाळण्यासाठी उपचार सुरू आहेत.
फिल्मी: 'धुरंधर'च्या यशावर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया: तीन शब्दांत म्हणाला-
अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या जबरदस्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, इतकी प्रसिद्धी मिळूनही अक्षय खन्नाने आतापर्यंत मौन बाळगले होते. अखेर चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी अक्षयची या यशावर असलेली पहिली प्रतिक्रिया उघड केली आहे. अक्षय तीन शब्दांत काय म्हणाला?
महाराष्ट्र: ज्येष्ठ शिल्पकार 'महाराष्ट्र भूषण' राम सुतार यांचे निधन
महापुरुषांच्या शिल्पकृती साकारणारे राम सुतार यांचे निधन झाले. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह जगभरात २०० हून अधिक पुतळे त्यांनी बनवले. पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने ते सन्मानित होते. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवी भाव दर्शवतात.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानात उद्रेक? असीम मुनीर पेचात अडकले, अमेरिकेचा दबाव वाढला
फिल्ड मार्शल असीम मुनीर पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची शक्यता आहे. या भेटीत गाझामध्यै सैन्य पाठवण्याबाबत चर्चा होऊ शकते. मागील ६ महिन्यात मुनीर तिसऱ्यांदा ट्रम्प यांना भेटतील. गाझामध्ये पाकिस्तानी सैन्य पाठवल्यास त्याचा परिणाम पाकिस्तानात दिसू शकतो. याठिकाणी लोकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता असल्याचं बोलले जाते. मात्र ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र: कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
सदनिका घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरल्याने आमदारकी आणि मंत्रिपद गमावले. न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. उच्च रक्तदाबामुळे ते रुग्णालयात दाखल; अजित पवारांकडे राजीनामा, भविष्य अनिश्चित.
आंतरराष्ट्रीय: अमेरिकेची २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी ट्रम्प सरकारचा निर्णय
अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी पॅलेस्टिनी प्राधिकरणासह आणखी २० देशांतील नागरिकांसाठी प्रवेशबंदी केली आहे. धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने तसेच सहकार्य मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कायमस्वरूपी रहिवासी आणि व्हिसाधारकांना सूट देण्यात आली आहे.
बीड: ड्रोनद्वारे पाहणी आणि पोलिसांच्या छाप्यामुळे महामार्ग लुटीचा पर्दाफाश
बीड पोलिसांनी धाराशिवमध्ये धाड टाकून १४ लाखांचे दागिने आणि रोकड जप्त केली. वाशी तालुक्यातील खामकरवाडीत बहुतांश लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. पोलिस गेल्यावर त्यांच्यावर हल्ला केला जातो. त्यामुळेच बीड पोलिसांनी काळजी घेत आरसीपीच्या विशेष तुकडीसह १०० पोलिसांची फौज घेऊन वस्तीला वेढा घातला होता. सोबतच ड्रोनचीही मदत घेण्यात आली. महामार्गावरील लुटीच्या गुन्ह्यात तीन संशयितांना अटक, तर तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
सखी: केसांच्या वाढीसाठी घरगुती तेल
केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? नारळ तेल, बदाम आणि कढीपत्ता यांसारख्या सहज उपलब्ध घटकांचा वापर करून केसांची वाढ आणि आरोग्य सुधारण्यासाठी एक सोपा आयुर्वेदिक तेल उपाय..
सखी: गरम केलेले आरओ पाणी: फायदे, तोटे आणि तज्ञांचा सल्ला
गरम आरओ पाणी पचनास मदत करते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते, पण खनिजांचे प्रमाण बदलू शकते. आरओ फिल्टरेशन हानिकारक पदार्थ काढून टाकते, चव आणि सुरक्षितता सुधारते. सर्वोत्तम परिणामांसाठी आरओ पाणी उकळण्याची गरज नाही.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर २०१५: शिवसेना मोठा, MIM दुसरा पक्ष
२०१५ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यानंतर एमआयएम या पक्षाचे तब्बल २४ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना-भाजप युतीने काही अपक्षांच्या मदतीने बहुमताचा ५८ आकडा पार करीत पाच वर्षे मनपावर राज्य केले होते. आता शिवसेनेतील फुटीमुळे युती बदलत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. युती अजूनही अनिश्चित आहे.