आपण यांना पाहिलं का?; उद्धवसेनेने लावले 'नॉट रिचेबल' नगरसेवकांचे पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:55 IST2026-01-26T12:55:31+5:302026-01-26T12:55:55+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या उद्धवसेनेचे ११ पैकी ४ नगरसेवक काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' आहेत. त्यापैकी दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

आपण यांना पाहिलं का?; उद्धवसेनेने लावले 'नॉट रिचेबल' नगरसेवकांचे पोस्टर
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या उद्धवसेनेचे ११ पैकी ४ नगरसेवक काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' आहेत. त्यापैकी दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. आता त्या दोघांचेही फोटोपोस्टर उद्धवसेनेने सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लावले असून, संबंधितांची माहिती मिळाल्यास शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कल्याण पूर्वेतील मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.
पोलिसांकडून तपास होत नसल्याचा आरोप पोलिसांकडून तपास होत नसल्याचा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तसेच उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमेतील राहुल कोट आणि स्वप्नाली केणे यांच्याशीही संपर्क नाही. ते मनसेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोघांबाबत मात्र उद्धवसेनेने अजून आक्रमक भूमिका घेतलेली नाही. यासंदर्भात उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमचे शहरप्रमुख बाळा परब यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
अवतरण चिन्ह मजकूर:
पश्चिमेतील राहुल कोट आणि स्वप्नाली केणे या दोन बेपत्ता झालेल्या नगरसेवकांबाबत आम्ही खडकपाडा आणि महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. लवकरच त्यांची छायाचित्रे पोस्टर स्वरूपात लावली जाणार आहेत. - बाळा परब, शहरप्रमुख उद्धवसेना, कल्याण पश्चिम
अशाप्रकारे पोस्टर लावणे बदनामी मधुर म्हात्रे हे उद्धवसेनेतच आहेत. ते विपश्यनेला गेले आहेत. तेथे फोन वापरण्याची परवानगी नाही, अशी पोस्ट मधुर यांनी केली आहे; परंतु आम्हाला न विचारता त्यांचे असे पोस्टर लावता ही बदनामी आहे. या संदर्भात आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी दिली आहे. दरम्यान, चारही बेपत्ता नगरसेवकांना व्हिप बजावला जाणार असल्याचे उद्धवसेनेचे आ. वरुण सरदेसाई यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.