Valentine's Day Special:लवकरच शीतली आणि अजिंक्यच्या आयुष्यात येणार 'लागिरं' झालं क्षण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:21 IST2018-02-07T07:51:52+5:302018-02-07T13:21:52+5:30
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना शीतलीलाही हवंय खास प्रेमाचा तोहफा.होय,छोट्या पडद्यावर टॉम अण्ड जेरी कपल म्हणून ओळखले ...

Valentine's Day Special:लवकरच शीतली आणि अजिंक्यच्या आयुष्यात येणार 'लागिरं' झालं क्षण!
व हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना शीतलीलाही हवंय खास प्रेमाचा तोहफा.होय,छोट्या पडद्यावर टॉम अण्ड जेरी कपल म्हणून ओळखले जाणारे शीतली आणि अजिंक्यच्या लव्ह स्टोरीमध्ये लवकरच इंटरेस्टिंग टर्न पाहायला मिळणार आहे.'लागिर झालं जी'च्या सेटवरुन आलेली ताजा खबर म्हणजे लवकरच अजिंक्य देणार शीतलच्या प्रपोजचं उत्तर.ट्रेनिंगवरुन सुट्टीसाठी परत येणाऱ्या अजिंक्यने शीतलला सरप्राइज द्यायचं ठरवलंय.पण पवारांच्या शीतलीला अजिंक्यच्या या सरप्राइजची आधीच खबर लागली आहे. त्यामुळे आता शीतल अजिंक्यच्या सरप्राइजवर कशी गुगली टाकणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.साऱ्या ट्रेनिंग सेंटरसमोर ''लाखात एक तूच माझा फौजी'' म्हणणाऱ्या शीतलला अजिंक्य थेट लग्नाची मागणी घालणार आहे.फौजी लाखात एक असतो पण त्याची बायको दहा लाखात एक असते.या फौजीसाठी तू त्या दहा लाखातली एक होशील का? अज्याच्या या प्रश्नाचं शीतल कसं उत्तर देणार ही खरी गंमत रसिकांना पाहायला मिळणार आहे.मात्र हा रंजक टर्न पाहण्यासाठी रसिकांना पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.
Also Read:‘लागीर झालं जी’ मालिकेचा असा झाला जन्म,अभिनेत्रीपासून यशस्वी मालिका निर्माती बनलेल्या श्वेता शिंदेकडून गुपित उघड
छोट्या पडद्यावर ‘लागीर झालं जी’ ही मालिका गाजत आहे. मालिकेत अजिंक्य म्हणजेच अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी रंगते आहे. त्यातच अजिंक्य लष्करात भरती झाला असून ट्रेनिंगसाठी रवाना झाला आहे. एकीकडे अजिंक्य आणि शीतलच्या मनाची तगमग तर दुसरीकडे खडतर अजिंक्यचं लष्कराचं खडतर प्रशिक्षण यामुळे मालिका दिवसेंदिवस रसिकांना भावते आहे. भारतीय जवान, देशप्रेम हा मालिकेच्या कथेचा मुख्य गाभा आहे. रसिकांची मने जिंकणा-या या मालिकेची निर्माती एक मराठमोळी अभिनेत्री आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिने या मालिकेची निर्मिती केली आहे.'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदे हिने भूमिका साकारल्या होत्या. आता 'लागीर झालं जी' या मालिकेच्या निमित्ताने एक यशस्वी निर्माती म्हणून श्वेताने छाप पाडली आहे.
Also Read:‘लागीर झालं जी’ मालिकेचा असा झाला जन्म,अभिनेत्रीपासून यशस्वी मालिका निर्माती बनलेल्या श्वेता शिंदेकडून गुपित उघड
छोट्या पडद्यावर ‘लागीर झालं जी’ ही मालिका गाजत आहे. मालिकेत अजिंक्य म्हणजेच अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी रंगते आहे. त्यातच अजिंक्य लष्करात भरती झाला असून ट्रेनिंगसाठी रवाना झाला आहे. एकीकडे अजिंक्य आणि शीतलच्या मनाची तगमग तर दुसरीकडे खडतर अजिंक्यचं लष्कराचं खडतर प्रशिक्षण यामुळे मालिका दिवसेंदिवस रसिकांना भावते आहे. भारतीय जवान, देशप्रेम हा मालिकेच्या कथेचा मुख्य गाभा आहे. रसिकांची मने जिंकणा-या या मालिकेची निर्माती एक मराठमोळी अभिनेत्री आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिने या मालिकेची निर्मिती केली आहे.'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदे हिने भूमिका साकारल्या होत्या. आता 'लागीर झालं जी' या मालिकेच्या निमित्ताने एक यशस्वी निर्माती म्हणून श्वेताने छाप पाडली आहे.